
भाजप, कंगना रानौत, झारखंड, JPSC, JSSC, गुन्हेगारी आणि राजकारण, Parliament, Rahul Gandhi, BJP,
NDA MPs Protest: दिल्लीतील जंतरमंतरनंतर आता झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या भरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधातील विद्यार्थी आंदोलन चांगलेच तापले आहे. सोमवारी (10ऑगस्ट) विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची झळ आता राजधानी दिल्लीतही पोहोचली आहे. रांचीमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता भाजपने लोकसभा खासदार राहुल गांधींविरोधात मोर्चा उघडला आहे. आ
आज सकाळी संसद परिसरात भाजप खासदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली. एनडीएच्या खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेते संसदेतील चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप करत तीव्र आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ आणि विरोधी पक्षांच्या विरोधात, एनडीएच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराकडे मोर्चा काढला.
भाजपच्या खासदारांनी, गृहमंत्री आणि सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहेत. परंतु विरोधी पक्ष सभागृहात गोंधळ घालत आहे आणि सभागृहाचा वेळ वाया घालवण्यासाठी व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी चर्चेतून पळ काढत असल्याचा आरोप केला.
भाजप खासदार कंगना रानौत म्हणाल्या, “राहुल गांधींनी चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. आधी ते म्हणाले की त्यांना दिल्लीतील विद्यार्थांवर झालेल्या लाठीचार्जबाबत चर्चा करायची आहे, पण जेव्हा यासाठी त्यांचे स्वागत करण्यात आले, तेव्हा त्यांनी नकार दिला. ते देशाशी गद्दारी करत आहेत, सभागृहाचे कामकाज एका दिवसासाठीही चालू देत नाहीत.”
दरम्यान, भाजप नेते आणि खासदार तरुण चुघ म्हणाले, “हा दुटप्पीपणा आहे. राहुल गांधी सभागृहापासून पळ काढत आहेत आणि झारखंडमधील मुलांवरील लाठीचार्जवर गप्प बसले आहेत. देश राहुल गांधींचा दुटप्पीपणा पाहत आहे. राहुल गांधींनी सभागृहात उत्तर दिले पाहिजे.”
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी गेल्या अनेक दिवसांपासून गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उत्तरांची मागणी करत आहेत. आता गृहमंत्री प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देण्यास तयार असल्याने, राहुल गांधींनी चर्चेपासून दूर पळू नये. किरेन रिजिजू म्हणाले, “राहुल गांधी चर्चेपासून पळून जाऊ शकत नाहीत. तुम्हाला गृहमंत्र्यांचा सामना करावाच लागेल.” त्यांनी सोशल मीडियावर #Rahul_Bhagana_Nahi आणि #BhagoMat हे हॅशटॅग्सही वापरले.