
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सोडून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली असून, न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होईपर्यंत किती नेते काँग्रेस पक्षाला ‘बाय-बाय’ करतील असा सवाल केला आहे.
त्यात त्यांनी ‘गांधी परिवाराकडून अन्याय सहन करून काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पक्ष सोडून जात आहे. त्यांनी पक्ष सोडण्यासाठी निवडलेली वेळ’ अशी आहे की राहुल गांधी खुद न्याय यात्रेवर आहेत’, असे मौर्य यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवारी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ १६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे प्रवेश करणार आहे. भदोही, प्रयागराज, प्रतापगड या मार्गाने जावून 19 फेब्रुवारी रोजी ती अमेठी येथे पोहचणार आहे. राहुल अमेठी लोकसभा क्षेत्रात गौरीगंज येथे जाहीर सभा घेणार आहेत.
यात्रा 20 फेब्रुवारीला रायबरेली, लखनऊ येथे पोहचणार असून, लखनऊ येथे रात्री मुक्काम होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा उन्नाव येथे जाईल तेथे उन्नाव शहर व शुक्लागंज मार्ग कानपुर में शहरात दाखल होईल.