Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना आमचं सरकार…”, काँग्रेस उमेदवाराची अजब घोषणा

मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 10, 2024 | 10:47 AM
“ज्यांच्या दोन बायका असतील त्यांना आमचं सरकार…”, काँग्रेस उमेदवाराची अजब घोषणा
Follow Us
Follow Us:

मध्यप्रदेश : लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरु आहे, देशभरामध्ये निवडणूकीचे वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींच्या सभा देखील वाढल्या आहेत. घोषणा अन् आश्वासनांची तर रीघ लागली आहे. मात्र कॉंग्रेसच्या एका नेत्याने प्रचारसभेमध्ये अजब घोषणा केली आहे. ज्यांना दोन बायका असतील त्यांना दोन लाख रुपये देऊ अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्या रतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी केली आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

दोन बायका असतील त्यांना २ लाख रुपये

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. स्वयंपाकाचा गॅस, बस प्रवासासाठी सबसिडी दिली जाणार आहे. या योजनेचा प्रचार करत असताना कांतीलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. भूरिया म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने न्याय पत्रात (निवडणुकीचा जाहीरनामा) महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. याअंतर्गत आमचं सरकार आलं तर गरीब कुटुंबातील महिलांना आम्ही दर वर्षी १ लाख रुपये देणार आहोत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या दोन बायका (पत्नी) असतील त्यांना २ लाख रुपये मिळतील. कांतीलाल भूरिया यांच्या या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

भाजपकडून तक्रार तर कॉंग्रेसकडून समर्थन

विरोधकांनी कांतीलाल भूरिया यांच्या या वादग्रस्त विधानावरुन कॉंग्रेसला घेरले. भाजपने टीकेची झोड उठवत जोरदार टीका देखील केली आहे. भुरिया यांच्या वक्तव्यावरुन मध्यप्रदेशचे राजकारण रंगले आहे. भाजपने कांतीलाल भूरिया यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र कॉंग्रेसकडून भूरिया यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला जात आहे. या प्रचारसभेवेळी मंचावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारीदेखील उपस्थित होते. पटवारी म्हणाले, भूरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे. दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे. महालक्ष्मी योजनेनुसार काँग्रेसने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख महिलांना दर महिन्याला ८,५०० रुपये अर्थसहाय्य केलं जाईल.

Web Title: Congress candidate from madhya pradesh ratlam lok sabha constituency kantilal bhuria made a controversial statement about women nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • Lok sabha elections 2024
  • political news

संबंधित बातम्या

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
1

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
2

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.