Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या करारांची मुदतवाढ देखील अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले. कार्यालय प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 07:59 AM
मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; 'त्या' 314 नियुक्त्याच केल्या रद्द

मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; 'त्या' 314 नियुक्त्याच केल्या रद्द

Follow Us
Follow Us:

मुंबई : मंत्र्यांच्या मर्जीतील व मंत्रालयात दीर्घकाळापासून मलाईदार खाती सांभाळणाऱ्या ३१४ कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्यांविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत त्यांना त्यांच्या मूळ कार्यालयात परतण्यासाठी १० सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे. या संदर्भात, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी परिपत्रक जारी करून सर्व कर्मचाऱ्यांना विहित वेळेत त्यांच्या मूळ कार्यालयात परतण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

याअंतर्गत, मंत्रालयाच्या कार्यालयात ‘मौखिक’ नेमणुका, म्हणजेच केवळ तोंडी आदेशांद्वारे केलेल्या सर्व नेमणुका तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. सरकारने म्हटले आहे की, अशा नेमणुकांमुळे मूळ कार्यालय आणि कर्मचारी कार्यालय या दोघांनाही रिक्त पदे भरणे अवघड होते, ज्यामुळे मूळ विभागाच्या कामावर परिणाम होतो आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. यामुळे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षणही धोक्यात येते.

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम

दरम्यान, या परिपत्रकात अशी चिंता व्यक्त करण्यात आली की, मंत्रालयाचे काम प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे आणि गोपनीय असूनही, प्रतिनियुक्तीवर किंवा केवळ तोंडी आदेशाद्वारे नियुक्त केलेल्या या कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे, गोपनीय अहवाल, विभागीय चौकशी आणि इतर सेवा-संबंधित बाबींसाठी तपासणी केली गेली नाही.

परिपत्रकातील ठळक मुद्दे काय?

संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या करारांची मुदतवाढ देखील अन्यायकारक असल्याचे सांगण्यात आले. कार्यालय प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा संबंधित विभागाच्या सचिवांनी २० सप्टेंबरपर्यंत मुख्य सचिवांच्या कार्यालयात अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

उपस्थितीची सुविधा तात्काळ बंद

जर एखादा कर्मचारी मूळ कार्यालयात हजर झाला नाही, तर संबंधित कार्यालयाला त्यांचा पगार रोखून धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रद्द केलेल्या नियुक्त्यांशी संबंधित ओळखपत्र, चेहरा ओळख व उपस्थितीची सुविधा तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

Web Title: Chief minister devendra fadnavis cancels 314 appointments know reason behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका
1

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
2

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

Devendra Fadnavis: सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
3

Devendra Fadnavis: सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
4

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.