Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याच्या दाव्यावर काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले, ‘वातावरण निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या…’

भारताच्या अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स ओलांडल्याच्या दाव्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. जयराम रमेश यांनी याला फेक न्यूज म्हटले आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 20, 2023 | 09:30 PM
भारतीय जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याच्या दाव्यावर काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले, ‘वातावरण निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या…’
Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेसने सोमवारी (20 नोव्हेंबर) भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याचा केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचा दावा खोटा ठरवला. सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेसने आरोप केला की,या फेक न्यूजचा उद्देश केवळ वातावरणनिर्मिती करणे आणि मथळे तयार करण्याचा प्रयत्न आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काल रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.45 ते 6.45 दरम्यान संपूर्ण देश क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यात व्यस्त होता.त्यावेळी, राजस्थान आणि तेलंगणाचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते उद्योगपती यांच्यासह मोदी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी ट्विट केले होते की, भारताचा जीडीपी आकडा प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे.’

काँग्रेस नेते जयराम म्हणाले की, हे वृत्त पूर्णपणे खोटे असून, हा केवळ बेफिकीरपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. रविवारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर या संदर्भात पोस्ट केली होती. एका दिवसानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या सर्व टिप्पण्यांवर प्रत्युत्तर दिले.

नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला होता की भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, यावरून मोदी सरकारची गतिमानता आणि दूरदर्शी नेतृत्व दिसून येते. नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे

भारतासाठी जागतिक अभिमानाचा क्षण – गजेंद्र सिंह शेखावत

ट्विटरवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले होते की, भारतासाठी हा जागतिक अभिमानाचा क्षण आहे कारण आपला जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय खरोखरच अनोखा आहे.

दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – गौतम अदानी

X वर स्क्रीनशॉट शेअर करताना गौतम अदानी यांनी लिहिले, “अभिनंदन भारत, फक्त दोन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. आम्ही जपानची 4.4 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि जर्मनीची 4.3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था मागे टाकू. तिरंगा फडकतच राहील, जय हिंद.

Web Title: Congress hits out at claim of indian gdp crossing 4 trillion nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2023 | 09:30 PM

Topics:  

  • Congress
  • india
  • Jairam Ramesh

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
3

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.