Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र

काँग्रेससह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, काही डाव्या विचारसरणीच्या स्वयंसेवी संस्था आणि लक्षवेधी व्यक्ती या कथित “एसआयआरविरोधी” वक्तव्यांमध्ये सामील झाले असल्याचे नमूद केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 05:03 PM
272 people write an open letter to Rahul Gandhi

272 people write an open letter to Rahul Gandhi

Follow Us
Close
Follow Us:
  • 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र
  • काँग्रेसचा निवडणूक आयोगावर भाजपशी संगनमत असल्याचा आरोप
  • राजकीय निराशा लपवण्याचा प्रयत्न
Rahul Gandhi News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर देशातील माजी न्यायाधीश आणि निवृत्त नोकरशहांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २०० हून अधिक सदस्यांच्या या गटाने एका पत्राद्वारे राहुल गांधींच्या आरोपांना “राजकीय निराशा लपवण्याचा प्रयत्न आणि संस्थांवर हेतुपुरस्सर हल्ला” असल्याचे म्हणत टीका केली आहे.

काँग्रेसने निवडणूक आयोगावर भाजपशी संगनमत असल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गटाने पत्रात  राहुल गांधींवर टिका केली आहे. “समाजातील ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला चिंता वाटते की भारताची लोकशाही संस्थांविरुद्धच्या विषारी भाषणामुळे घेरावात सापडली आहे. काही राजकारणी कोणताही ठोस पर्याय न देता नाट्यमय रणनीतींचा भाग म्हणून निराधार आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत.” असा आरोपही केला आहे.

उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५७८ परवडणारी घरे; ७२३ कोटींच्या गृहनिर्माण महाप्रकल्पाला हिरवा कंदील

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय संस्थांवर केलेल्या कथित आरोपांवर २७२ माजी अधिकारी आणि मान्यवरांनी स्वाक्षरी केलेले पत्र जारी केले आहे. या पत्रावर १६ निवृत्त न्यायाधीश, १२३ माजी नोकरशह, १३३ निवृत्त लष्करी अधिकारी आणि १४ माजी राजदूत अशा एकूण २७२ व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्राला अद्याप राहुल गांधी किंवा कोणत्याही राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

काय म्हटले आहे पत्रात?

भारतीय सशस्त्र दलांच्या धाडस व कामगिरीवर, न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर, तसेच संसदेवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. आता या कृतींचा विस्तार होत भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठा आणि सचोटीवरही ‘कट रचून हल्ले’ केले जात असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात निवडणूक आयोगावर केलेल्या त्यांच्या आरोपांवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी वारंवार निवडणूक आयोगावर हल्ले चढवले असून मतदान प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे दावे केले आहेत “अशा गंभीर आरोपांनंतरही त्यांनी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही,” असा उल्लेख गटाने केला आहे.

पत्रानुसार, काँग्रेससह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, काही डाव्या विचारसरणीच्या स्वयंसेवी संस्था आणि लक्षवेधी व्यक्ती या कथित “एसआयआरविरोधी” वक्तव्यांमध्ये सामील झाले असल्याचे नमूद केले आहे.

‘राजकीय निराशा लपवण्याचा प्रयत्न’

“निवडणूक आयोग निर्लज्जपणे भाजपच्या बी-टीमसारखे वागत आहे,” अशी वक्तव्ये करण्यात आली असली तरी ही आरोपात्मक भाषा भावनिक असू शकते, परंतु ती कोणत्याही तपासात टिकत नाही. आयोगाने एसआयआरची माहिती सार्वजनिक केली आहे, न्यायालयाने निर्देशित केलेल्या प्रक्रियांचे पालन केले आहे, अपात्र मतदारांची नावे वगळली आहेत आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी केली आहे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, निवडणूक आयोगावर होत असलेली टीका ही केवळ संस्थात्मक संकटाचे आभास निर्माण करून राजकीय निराशा लपवण्याचा प्रयत्न आहे.

पंतप्रधानांकडे तक्रार केली तरी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडताना शांत बसू शकत नाही : फडणवीस

काँग्रेस नेत्यांच्या वर्तनावर टीका

पत्रात काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारंवार निवडणुकीतील पराभव आणि त्यातून निर्माण झालेल्या रागामुळे अशी वक्तव्ये होत असल्याची टीकाही या अधिकाऱ्यांकडून  करण्यात आली आहे. “जेव्हा राजकारणी नागरिकांच्या आकांक्षांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा ते स्वतःची विश्वासार्हता पुनर्संचयित करण्याऐवजी संस्थांवर राग काढत आहेत,” असे त्यात नमूद केले आहे.

‘सार्वजनिक सेवा तमाशा ’

विश्लेषणाऐवजी नाट्यमय टीका केली गेली तर सार्वजनिक सेवा “तमाशा बनते.” विरोधी पक्षांच्या सरकारे असलेल्या काही राज्यांत निकाल अनुकूल असल्यास निवडणूक आयोगावरची टीका अचानक थांबते, मात्र काही राज्यांत निकाल प्रतिकूल आल्यास आयोगालाच दोष दिला जातो, अशीही खंत व्यक्त करण्यात आली आहे.

 

Web Title: From former judges to bureaucrats 272 people write an open letter to rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Congress
  • national news
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार
1

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत
2

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
3

Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
4

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.