
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील हामून चक्रीवादळाची (Hamun Cyclone) तीव्रता वाढली आहे. हे चक्रीवादळ आता वरच्या दिशेने प्रवास करत आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये मणिपूर, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. आसामचा दक्षिण भाग, मेघालयचा पूर्व भाग, तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागाला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं आयएमडीने स्पष्ट केलं आहे. याठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
हवामान विभागाने आज आणि उद्या मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील दिला आहे. हा इशारा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. 25 तारखेच्या संध्याकाळपर्यंत या चक्रीवादळाचा जोर कमी होईल, आणि ते संपून जाईल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.