
India Alliance PC: इंडिया आघाडीच्या बैठकीत ५ मुद्द्यावंर चर्चा झाली. यात नीट परीक्षेतील घोटाळ्यांपासून भारतीय अर्थव्यवस्थेपर्यंतच्या विषयांचा समावेश होता. आजच्या बैठकीत एकूण २५ पक्षांचा समावेश होता. अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा समावेश होता. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत खर्गे बोलत होते.
यावेळी बोलताना खर्गे म्हणाले की, एसआयआर मतदार याद्यांमधील फेरफार आणि निवडणुकीतील निष्पक्षता यांसारख्या गंभीर प्रश्नांसंबंधी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले जाईल. दुसरे, लाखो विद्यार्थायांना प्रभावित करणाऱ्या अनेक गंभीर मुद्यांची स्थिती पाहता आणअ नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तात्काळ राजीनामा द्यावा. तिसरे, आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, अॅट्रोसिटी आणि शेतकऱ्यांचे मुद्दे आम्ही उठवच राहणार, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. चौथे, आम्ही दर दोन महिन्यांनी भेटू, पुढची बैठक ८ ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. पाचवे, संसदेत सर्वपक्षीय समन्वय सुरू राहील.
बैठकीनंतर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “इंडिया अलायन्सच्या बैठकीला २५ पक्ष उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन हे देखील व्हर्च्युअली बैठकीत सामील झाले आणि त्यांनीदेखील त्यांची मते मांडली. आजच्या बैठकीत झालेल्या सर्व मुद्द्यांवर त्यांचीदेखील सहमती आहे. यानंतर आम्ही पाच मुद्द्यावर एकमताने निर्णय घेतला. आज आम्ही सहमत झालो आहोत की, आम्ही या मुद्द्यांसाठी लढू, त्यावर काम करू आणि पुढे जाऊ.”
“केंद्र सरकारने सध्याची गंभीर आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी. सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी भेटतील असे ठरले आहे.” पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदीय समन्वय सुरू राहील आणि विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात दररोज सकाळी बैठका होतील. अखिल भारतीय आघाडीतील सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी भेटतील असे ठरले आहे. पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे होणार आहे.” असंही त्यांनी नमुद केलं.
NCP Rajya sabha Candidate: भुजबळांचा पत्ता कट; राष्ट्रवादीकडून बड्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी
पक्षाच्या सूत्रांनुसार, या बैठकीत भविष्यातील राज्य विधानसभा निवडणुका आणि इतर राजकीय आव्हानांसाठी किमान समान कार्यक्रमावरही चर्चा होऊ शकते. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मते, जर सर्व पक्ष नियमितपणे एकत्र आले, तर परस्पर विश्वास दृढ होईल आणि जनतेला सकारात्मक व एकजूट विरोधी पक्षाचा संदेश जाईल. हैदराबादमधील ही बैठक विरोधी आघाडीला नवी दिशा देण्यासाठी आणि सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनीतीमध्ये एक मैलाचा दगड ठरू शकते.