
भारतीय बासमती तांदूळ हा जगातील सर्वोत्तम तांदूळ ठरला आहे. जगातील सर्वोत्तम 6 तांदळाच्या वाणांच्या यादीत भारताच्या बासमती तांदळाला पहिलं स्थान मिळालं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. आता भारतीय बासमती तांदूळ ‘नंबर 1’ ठरला आहे. फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्ट ॲटलसने जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत भारतीय बासमती तांदळाला प्रथम स्थान दिलं आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इटलीचा अरबोरियो तांदूळ तर, पोर्तुगालचा कॅरोलिनो तांदूळ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
“बासमती ही एक लांब धान्य असलेली तांदळाची प्रजाती आहे. जी मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवली आणि लागवड केली जाते. तांदूळ त्याच्या चव आणि सुगंधाने वैशिष्ट्यीकृत आहे. याचा अन्न म्हणून प्रामुख्याने वापर केला जातो. याच्यापासून बनवलेला भात बराच काळ सुट्टा राहतो. ज्यामुळे त्याला विविध खाद्यपदार्थांच्या रेसीपीमध्ये आणि त्याचे खास पदार्थ करताना वापरला जातो. तांदूळ नावाचे हे धान्य जितके लांब तितकेच चांगले मानले जाते आणि सर्वोत्तम बासमती धान्यांचा रंग किंचित सोनेरी असतो.”
बासमती तांदळाच्या गुणांवर भर
“जगातील सर्वोत्तम तांदूळ” म्हणून बासमती तांदूळ , टेस्ट ॲटलस द्वारे उल्लेखीत केला जात असताना त्याच्या अद्वितीय गुणांवर जोर देण्यात आला. ज्यामध्ये बासमतीचे वर्णन करताना भारत आणि पाकिस्तानमध्ये मूळतः लागवड केलेल्या लांब-दाण्याचे तांदूळ प्रकार म्हणून केले आहे. तांदूळ त्याच्या विशिष्ट नटी, फुलांचा आणि किंचित मसालेदार चव आणि सुगंधाने ओळखला जातो. एकदा शिजल्यावर, बासमतीचे दाणे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवतात, एकत्र चिकटत नाहीत.
भारत तांदळाचा प्रमुख निर्यातदार
तांदूळ निर्यातीत भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार बनला आहे. या कालावधीत, भारताने विक्रमी 23 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे, जो जागतिक बाजारपेठेतील एकूण तांदळाच्या 40.8 टक्के आहे. जगभरातील बासमती तांदळाच्या निर्यातीच्या बाबतीत, भारत 65 टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो, तर पाकिस्तान 35 टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो.