
Water Crisis, Central Water Commission, Red Alert, Reservoir Storage
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये आता त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक राज्यांमध्ये धरणांमधील पाणीपातळी अत्यंत नाजूक पातळीवर पोहोचली आहे, तर काही जलाशय पूर्णपणे कोरडे पडले आहेत. वाढते तापमान, ‘एल निनो’चा प्रभाव आणि घटते जलसाठे या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशाचे लक्ष आता मान्सूनवर केंद्रित झाले आहे.
कारण या संकटातून दिलासा मिळवण्यासाठी मान्सून हाच आता एकमेव आशेचा किरण ठरला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, देशभरातील १६६ प्रमुख जलाशयांमधील एकूण ‘जिवंत साठा’ कमी होऊन ४५.४१९ अब्ज घनमीटर इतका राहिला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, या जलाशयांमध्ये ६६.८३० अब्ज घनमीटर पाणी होते, जे त्यांच्या एकूण क्षमतेच्या ३६.४१ टक्के इतके होते.
याचा अर्थ असा की, कडाक्याची उष्णता आणि पाण्याच्या प्रचंड मागणीमुळे अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच या प्राथमिक जलस्रोतांमधून सुमारे २१.४११ अब्ज घनमीटर पाणी कमी झाले. हवामान विभागाने ‘एल निनों’ च्या प्रभावामुळे संभाव्य दुष्काळाचा इशारा यापूर्वीच दिला आहे. या अंदाजामुळे सध्याच्या चिंतांमध्ये आणखीच भर पडली आहे.
दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे, सध्याचा जलसाठा हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या आणि मागील दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत थोडासा अधिक आहे. तरीही, ज्या चिंताजनक वेगाने धरणे रिकामी होत आहेत.
पाण्याच्या या तीव्र टंचाईचा देशाच्या जलविद्युत क्षेत्रावर बेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच, देशातील २० प्रमुख जलविद्युत प्रकल्पांपैकी ८ प्रकल्पांशी संबंधित जलाशयांमधील पाणीपातळी सामान्य पातळीपेक्षा खाली घसरली होती.
पाण्याच्या या तीव्र टंचाईचा देशाच्या जलविद्युत क्षेत्रावर बेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच, देशातील २० प्रमुख जलविद्युत प्रकल्पांपैकी ८ प्रकल्पांशी संबंधित जलाशयांमधील पाणीपातळी सामान्य पातळीपेक्षा खाली घसरली होती.
देशातील १६६ प्रमुख जलाशयांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला एकूण ६६.८३० अब्ज घनमीटर (बीसीएम) इतका पाणीसाठा उपलब्ध होता, जो ३१ मे पर्यंत कमालीची घट होऊन ४५.४१९ बीसीएमवर खाली आला आहे. यामुळे आता या प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा शिल्लक राहिला असून धरणांची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. यातील ११२ प्रमुख जलाशयांमधील पाणीपातळी प्रचंड खाली आली असून, मे महिन्याच्या सुरुवातीला सामान्य पातळीपेक्षा अधिक पाणीसाठा असलेली केवळ ६ धरणे शिल्लक राहिली आहेत.
विशेषतः दक्षिण भारतातील परिस्थिती पाहता, तेथील जलाशयांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला २६.८३% असलेला पाणीसाठा ३१ मे पर्यंत १७.५५% वर घसरला आहे. देशातील काही जलाशय तर पूर्णपणे कोरडे पडले असून, महाराष्ट्रातील भीमा-उजनी धरण आणि बिहारमधील चंदन धरण या दोन्ही जलाशयांमध्ये आता ०% पाणीपातळी शिल्लक राहिली आहे. यामुळे गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या धरणांची संख्या ११ वरून थेट १५ पर्यंत वाढली आहे. विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार केला तर मध्य भारतात २६.६०% जलसाठा शिल्लक असून, पश्चिम भारतातील जलसाठ्यातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.