देशात पुन्हा लॉकडाऊन? सोशल मीडियावरील अफवांवर केंद्र सरकारचा मोठा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच संसदेत कोविड-१९ च्या परिस्थितीवर भाष्य करताना देशाला ‘तयार राहा’ असे आवाहन केले होते. मात्र, या विधानाचा विपर्यास करून काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली. गेल्या २४ ते ४८ तासांपासून काही जुने व्हिडिओ आणि खोट्या पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होत्या, ज्यावर सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे.
India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याचा मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर, हरदीप सिंग पुरी यांनी लॉकडाऊनबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत म्हटले की: “भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, शासकीय स्तरावर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. नागरिकांनी अशा बेजबाबदार अफवांना बळी पडू नये.”
तसेच, जरी जागतिक परिस्थिती अनिश्चित असली, तरी भारत सरकार ऊर्जा, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशाला इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहील, याची खात्री पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली घेतली जात आहे. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्णपणे तयार आहेत. अशा काळात अफवा पसरवणे हे हानिकारक असून नागरिकांनी शांत, जबाबदार आणि एकजूट राहणे आवश्यक आहे.” असं पूरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आधीच इशारा दिला होता की, काही लोक अनिश्चिततेच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन समाजात घबराट पसरवण्याचा प्रयत्न करतील. अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.






