ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यावर सभागृहात बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप केला. त्यांनी विधान केले की, लोकसभा लोकशाही पद्धतीने चालवली जात नसून, महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याच्या त्यांच्या विनंत्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र, मी उभा राहिलो की मला बोलण्याची परवानगी नाकारली जाते. आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकारच दिला जात नाही. मी शांत बसलो होतो, तरीही मला संधी दिली नाही. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधकांना समान स्थान असते, पण या सभागृहात फक्त सरकारलाच महत्त्व दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याबद्दल भाषण दिले, त्यावर मला माझे विचार जोडायचे होते. बेरोजगारीसारख्या गंभीर विषयावर बोलायचे होते, पण संधीच दिली नाही.”
मात्र, विरोधी पक्षनेते जेव्हा सभागृहात त्यांच्या बाजूने भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना नियम दाखवून थांबवले जाते. त्याउलट, सरकारचे मंत्री किंवा भाजप खासदार उठले, की त्यांचे माइक लगेच सुरू होतात आणि त्यांना बोलण्याची संधी मिळते.”
गोगोई पुढे म्हणाले, “दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध स्थगन प्रस्ताव आणला असता तो फेटाळण्यात आला. मात्र, संसदीय कामकाज मंत्री जे कर्नाटकमधील प्रकरणावर चुकीचे आरोप करत होते, त्यांना मात्र संधी देण्यात आली. विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन हा मुद्दा उपस्थित केला. सध्या सरकार संसदीय परंपरा आणि विरोधी पक्षाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.”
तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी अगदी बरोबर सांगितले आहे. ते विरोधी पक्षनेते म्हणून केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर संपूर्ण विरोधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वीही त्यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली होती, आणि आज पुन्हा तसेच घडले. हे अत्यंत निंदनीय आहे. मी लोकसभा अध्यक्षांचा आदर करतो, पण त्यांच्यावर कोणता दबाव आहे, हे माहित नाही. विरोधी पक्षामध्ये अनेक प्रभावशाली नेते आहेत, त्यांना आवाज उठवण्यापासून रोखले जात आहे.”*
या प्रकरणावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “सभागृहाच्या शिष्टाचाराचे आणि परंपरांचे पालन करणे सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचे आहे. काही खासदारांनी संसदीय परंपरांचे पालन केले नाही, अशा अनेक घटना घडल्या आहेत. संसदेमध्ये अनेक पिढ्या काम करत आल्या आहेत. वडील, मुलगी, आई, पत्नी आणि पती असे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी संसदीय नियमांचे पालन करावे आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेस धक्का न लावता शिस्तबद्ध वर्तन करावे, अशी माझी अपेक्षा आहे.”