Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास’; पंतप्रधान मोदींनी सांगितली ‘ती’ महत्त्वाची गोष्ट

काही लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदींचे कुटुंब आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाही. तर मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2023 | 07:33 PM
‘मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास’; पंतप्रधान मोदींनी सांगितली ‘ती’ महत्त्वाची गोष्ट
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य (PM Modi Speech) केले. ते म्हणाले, ‘काही लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप काही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदींचे कुटुंब आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाही. तर मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले आहे. यामुळेच लोकांचा मोदीवर विश्वास (Trust on Modi) आहे’.

पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही कितीही शिव्या द्या, आरोप करा, पण लोकांचा तुमच्यावर परत विश्वास बसणार नाही. तुमच्या शिव्यांना आणि आरोपांना या कोटी-कोटी भारतीयांना तोंड द्यावे लागणार आहे. या लोकांना तुम्ही अनेक दशके अडचणीत टाकले होते. भाजपने या लोकांना अडचणीतून बाहेर आणले आहे. जे आधी इथे बसायचे ते तिकडे जाऊनही फेल झाले, पण देश पास झाला. निराशेच्या गर्तेत बुडालेल्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आताच काही जण जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन आले. लालचौकात तिरंगा लावण्याचा संकल्प घेऊन मीही मागच्या शतकात गेलो होतो, तेव्हा दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते.

दरम्यान, देशातील जनता खोटे आरोप करणाऱ्यांवर कधीच विश्वास ठेवणार नाही. देशातील ज्या गरिबाला मोफत धान्य मिळते, तो तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. अडचणींच्या काळात मोदी लोकांच्या कामाला आला आहे, म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘ईडी’मुळे अनेकजण आमच्याविरोधात एकत्र

भारत सर्वांसाठी आशेचा किरण आहे. काहींना देशाची प्रगती पाहून दु:ख होत आहे. ‘ईडी’मुळे अनेकजण आमच्याविरोधात एकत्र आले आहेत. अपयश आल्यावर सरकारवर आरोप केले जातात. अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: People trust modi because i have sacrificed my life for the country says pm narendra modi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 07:33 PM

Topics:  

  • Congress
  • Modi government
  • PM Modi Speech
  • PM Narendra Modi
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
3

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.