PM Modi parliamentary all-party meeting in Delhi after Operation Sindoor
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारताने दहशतवादी कृत्याला त्यांच्याच शब्दांमध्ये उत्तर दिले आहे. भारतीय सेनेकडून ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित काश्मीरमधील 9 दहशतवादी तळावर हल्ला करण्यात आला. मिसाईलच्या या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे दहशतवादी कृत्य सहन केले जाणार नाही असे ठणकावून उत्तर भारताने संपूर्ण जगाला दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजधानी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय संसदीय बैठक पार पडणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. आज (दि.08) सकाळी 11 ही बैठक बोलावली आहे. बैठकीदरम्यान, सरकार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईबद्दल अधिकृत माहिती देणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देखील दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी विरोधकांसह सर्व पक्षांनी सरकारच्या सर्व निर्णयाला समर्थन दिले होते. त्यानंतर आता भारताने ऑपरेशन सिंदूर करुन प्रत्युत्तर दिल्यानंतर देखील सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या बैठकीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल राजकीय नेत्यांना माहिती दिली जाईल. तसेच सर्व राजकीय पक्षांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली जाईल, ज्यामध्ये ऑपरेशनची उद्दिष्टे, हल्ला केलेले विशिष्ट दहशतवादी ठिकाणे, धोरणात्मक आणि सुरक्षा परिणाम आणि पाकिस्तानकडून कोणत्याही प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या बाबतीत भारताची तयारी या सर्व मुद्द्यांची माहिती दिली जाणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हा हल्ला झाला, ज्यामध्ये बैसरन खोऱ्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह २६ लोक ठार झाले होते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना सशस्त्र दलांनी केलेल्या लष्करी कारवाईची औपचारिक माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने केलेले अचूक होते आणि हे ऑपरेशन फक्त 25 मिनिटे चालले. पहाटे 1.05 ते 1.30 दरम्यान, मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूरमधील एका प्रमुख दहशतवादी प्रशिक्षण स्थळासह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी 24 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.
ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
भारताकडून ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तानकडून नापाक गोष्टींना सुरुवात झाली आहे. पाकिस्तानकडून सीमां भागांमध्ये गोळीबार सुरु आहे. भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात असून सीमाभागातील राज्याबाबत खबरदारी घेतली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर भारतातील पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी आवश्यक सामानाचा साठा करुन ठेवण्याच आवाहन केलं. पाकिस्तान आणि नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांसोबत अमित शाह यांची बैठक झाली. यामध्ये त्यांनी राज्यांना आवश्यक सामान आणि सेवा उपलब्ध ठेवा. सोबतच कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव कार्यासाठी SDRF, सिविल डिफेंस, होम गार्ड्स आणि NCC ला अलर्टवर ठेवायला सांगितलं आहे. याबाबत अमित शाह यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
In the meeting with the Chief Ministers and Lieutenant Governors of border states adjoining Pakistan and Nepal held today, asked the states to maintain the availability of essential goods and services and to keep relief and rescue forces like the SDRF, Civil Defence, Home Guards,… pic.twitter.com/oxbZgZOJMa
— Amit Shah (@AmitShah) May 7, 2025