
PM Narendra Modi addressed the Bharatiya Janata Party BJP Foundation Day 2026.
BJP Foundation Day: नवी दिल्ली : केंद्रामध्ये आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेला सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष अर्थात भाजपचा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने भाजप नेते (BJP Politics), पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी मोदींनी आपली भविष्यातील उद्दिष्ट्ये स्पष्ट केली असून भाजपचे संपूर्ण कामकाज ‘इंडिया फर्स्ट’ या तत्त्वावर आधारित असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी पक्षाच्या वैचारिक प्रवासाविषयी आणि कामगिरीविषयी सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले की, केंद्र आणि अनेक राज्यांमधील पक्षाच्या सरकारांनी नेहमीच जनकल्याणाला आपल्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. भारताला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्याचा पक्षाचा सामूहिक संकल्प आहे. भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, समाजसेवेत अग्रेसर असलेली आणि नेहमी राष्ट्राला प्राधान्य देणारी एक संघटना आहे. सोशल मीडियाद्वारे पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, पक्षाच्या धोरणांचा परिणाम तळगळांपर्यंत स्पष्टपणे दिसून येत आहे.
हे देखील वाचा : डोक्यावर पदर, आडवं कुंकू अन् हातात संविधान; राज्यसभेतील शपथविधीला ज्योती वाघमारेंची सावित्रीमाईंना खास आदरांजली
भाजप पक्षाचे सध्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी, पक्षाच्या इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनीही त्या कार्यकर्त्यांचे स्मरण केले, ज्यांच्या समर्पणाने आणि संघर्षाने पक्षाच्या विकासाला आकार दिला आहे. त्यांनी तळागाळातील अथक कार्यकर्त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना सुशासनासाठी समर्पित असल्याचे म्हटले.
आज भाजपला सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यासाठी, पक्षातील लाखो कार्यकर्त्यांनी पराक्रमी तपश्चर्या, त्याग आणि सहनशीलतेचे दर्शन घडवले आहे. आम्हाला अभिमान आहे की, आमच्या आचरणातून आम्ही भारतीय राजकारणात ‘राष्ट्र प्रथम’ हे नवे तत्व प्रस्थापित केले आहे. आज भाजप सुशासन आणि शेवटच्या घटका तपापर्यंत सेवा पोहोचवण्याचे प्रतीक बनला आहे. आपल्याला देशाला घुसखोरी, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि गुलामगिरीच्या मानसिकतेसारख्या आव्हानांपासून मुक्त करायचे आहे. या दिशेने केलेल्या आमच्या प्रयत्नांना भूतकाळात सकारात्मक यश मिळाले आहे आणि भविष्यातही मिळत राहील, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
भाजपा आज गुड गवर्नेंस के साथ-साथ लास्ट माइल तक डिलीवरी का सिंबल बन गई है। #47YearsOfNationFirst pic.twitter.com/lFzA8xciBV — Narendra Modi (@narendramodi) April 6, 2026
या प्रसंगी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जनसंघ काळातील आव्हानांचे स्मरण केले. शून्यातून जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रवास म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत अनेक दशके काम केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागाची, काटकसरीची आणि समर्पणाची गाथा आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी पाहिलेले ‘अंत्योदय’ म्हणजेच अंतिम व्यक्तीच्या उदयाचे स्वप्न, सध्याचे नेतृत्व करत असून ते प्रत्यक्षात साकार होत आहे, असा विश्वास देखील भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद