
पीडित तरुणाला समोर आणत राहुल गांधींचा संसदेतून गंभीर आरोप (Photo Credit- X)
नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केल्याच्या वृत्तानंतर राजकीय तणाव वाढला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अति-बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी १९ वर्षीय विद्यार्थ्याला झालेल्या गंभीर दुखापती प्रसारमाध्यमांना दाखवल्या आणि दावा केला की, पेलेट गनच्या वापरामुळे काही विद्यार्थ्यांची दृष्टीही गेली आहे.
#WATCH | LoP, Lok Sabha, Rahul Gandhi brings before the media a man he claims suffered pellet gun injuries during students’ protest He says, “I want to explain that my brother standing here was injured by a pellet gun while he was peacefully protesting, holding the Tricolour.… pic.twitter.com/TCQJ4OZJcu — ANI (@ANI) July 24, 2026
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडताना राहुल गांधी यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या. त्यांनी विद्यार्थ्यांवरील बळाच्या वापराची चौकशी, जखमींना त्वरित व योग्य वैद्यकीय उपचार आणि नुकसानभरपाई, तसेच नीट परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी केली. प्राप्त माहितीनुसार, सफदरजंग रुग्णालयाच्या अहवालातूनही नीट आंदोलनादरम्यान पेलेट गनमुळे दुखापत झाल्याच्या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे. या घटनेनंतर, नीट प्रश्नपत्रिका फुटणे आणि विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई यांबाबतचा गदारोळ अधिकच तीव्र झाला असून, त्याचे पडसाद संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत ही बैठक पार पडली. या बैठकीला सीजेपीच्या वतीने प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी प्रतिनिधीत्त्व केले. सरकारी कार्यालयाऐवजी तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात असून, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया हे ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. पण बैठकीच्या ऐन अर्धा तास आधी बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणाऐवजी विठ्ठलभाई पटेल हाऊल या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली.