
Sonam Wangchuk, Abhijit Dipke, Hunger Strike,
Abhijit Dipke Announce Hunger Strike : सलग २१ दिवस जंतर मंतरवर उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज रुग्णालयात दाखल केले. यावेळी जंतरमंतरवर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पण दिल्ली पोलिसांनी वागचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप सीजेपी केला आहे. सोनम वांगचुक यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. सोनम वागंचुक यांच्यानंतर आता आपणही आता उपोषणात सामील झाल्याचे दीपके यांनी सांगितले. उपोषणाची घोषणा करताना अभिजीत दीपके यांनी देशातील सर्वांना आपापल्या शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास जंतर मंतरवरील पोलीसांनी मंचासमोरील सुरक्षा जाळी तोडून मंचावर प्रवेश केला. सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या एका पथकाने जबरदस्ती उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा, दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे. पण वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर मंतरवरील लोकांची संख्या वाढू लागली आहे. आंदोलक हातात तिरंगा घेऊन दाखल होऊ लागले आहेत.
यापूर्वी, जेव्हा सोनम वांगचुकने उपोषण सुरू असताना, अभिजीत दीपके म्हणाला होता की तो उपाशी राहू शकत नाही.मला मायग्रेनचा त्रास असल्याने आपण खूप वेळ उपाशी राहू शकत नाही, त्यामुळे आपण उपोषण करत नसल्याचे त्याने सांगितले होते.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आजपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सर्वांना आपापल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये शांततापूर्ण आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. नियोजित संसद मोर्चा २० जुलै रोजी होणार असल्याचेही दिपके यांनी म्हटलं आहे.
सोनम वांगचुक हे विद्यार्थी संघटनेच्या इतर अनेक सदस्यांसह २८ जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर होते. या काळात पोलिसांनी २१ दिवस सुरक्षा पुरवली होती. मात्र, शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे जवान अचानक मंचावर चढले. मंचावरून सर्वांना हटवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना खाली उतरवून रुग्णालयात नेले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे जंतर मंतरवर आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप उसळला आहे. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.