Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi : ‘योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही’; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इस्रायलने इराणी भूमीवर केलेल्या लष्करी कारवाईला बेकायदेशीर आणि सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 21, 2025 | 05:21 PM
'योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही'; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं

'योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही'; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं

Follow Us
Close
Follow Us:

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इस्रायलने इराणी भूमीवर केलेल्या लष्करी कारवाईला बेकायदेशीर आणि सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सकरारचं मौन केवळ राजनैतिक चूक नाही तर आपल्या नैतिक आणि धोरणात्मक परंपरांपासून दूर जाणं देखील दर्शवत असल्याचं म्हटलं आहे.

Election Commission of India: निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय? आता EVM तपासणीच्या नियमातही  बदल

१३ जून रोजी इस्रायलने इराणी लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्याला धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. या कारवाईमुळे पश्चिम आशियात अशांतता आणखी वाढेल आणि त्याचे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भारताचे इराण आणि इस्रायल या दोघांशी ऐतिहासिक आणि धोरणात्मक संबंध आहेत. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात काश्मीर मुद्द्यावर भारताविरुद्धचा ठराव थांबविण्यास इराणने मदत केली तेव्हा त्यांनी इराणच्या पाठिंब्याची आठवण करून दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. ट्रम्पवर यांनी त्यांच्या गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून आक्रमक धोरण स्वीकारल्याचा आरोप केला. शिवाय इतिहास आपल्याला आठवण करून देतो की नेतन्याहू यांनी द्वेषाची आग पेटवण्यास मदत केली, ज्याचा शेवट १९९५ मध्ये पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्या हत्येत झाला, ज्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील शांततेसाठी सर्वात आशादायक वाटणारा उपक्रम संपुष्टात आला.

चाबहार बंदरावर परिणाम

२०१८ मध्ये अमेरिकेने अणुकरारातून (JCPOA) माघार घेतल्याने केवळ बहुपक्षीय राजनैतिक संबंधाचंच नुकसान झालं नाही तर चाबहार बंदर आणि उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सारख्या भारतासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांवरही परिणाम झाला. त्यांनी सांगितले की गाझामध्ये ५५,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, कुटुंबे आणि परिसर उद्ध्वस्त झाले आहेत आणि संपूर्ण परिसर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

Election Commission Of India: ‘तो’ एक लेख अन…; निवडणूक आयोग राहुल गांधीच्या जाळ्यात ?

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला भारताच्या पारंपारिक शांतता आणि संवाद धोरणाकडे परतण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की भारताने आपला मुद्दा स्पष्ट आवाजात मांडावा आणि प्रत्येक राजनैतिक माध्यमाचा वापर करून पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Web Title: Sonia gandhi slams modi govts silence on israel iran conflict urges india to back iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • Modi government
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
1

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.