Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही नोटीसही बजावत नाही अन् घर…’; याचिकाकर्त्याला २५ लाखांची नुकसानभरपाई द्या, SC चे यूपी सरकारला आदेश

याचिका दाखल करण्याऱ्याच्या वकिलांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. तुम्ही किती घरे पाडली असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला विचारला. त्यावर १२३ बेकायदा बांधकामे असल्याचे वकिलांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2024 | 03:36 PM
'तुम्ही नोटीसही बजावत नाही अन् घर...'; याचिकाकर्त्याला २५ लाखांची नुकसानभरपाई द्या, SC चे यूपी सरकारला आदेश

'तुम्ही नोटीसही बजावत नाही अन् घर...'; याचिकाकर्त्याला २५ लाखांची नुकसानभरपाई द्या, SC चे यूपी सरकारला आदेश

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये सध्या योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने अनेक अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर कारवाई केली आहे.  मात्र याच कारवाईमुळे सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ज्यांची ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत, त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय योगी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला बुलडोजर कारवाईवरून फटकारले आहे. उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणसाठी सरकारने अनेक घरे बुलडोजरने कारवाई करून पाडली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू होती. दरम्यान जय व्यक्तींची घरे पाडण्यात आली. त्या व्यक्तीला २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी सुरू होती.

महाराजगंज जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणसाठी सरकारने अनेक घरे बुलडोजरने कारवाई करून पाडण्यात आली होती. मनोज टिबरेवाल यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणात रीट याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणी करताना, ३.७ चौरस मीटरचे अतिक्रमण होते. मात्र तुम्ही याचा पुरावा देत नाही आहात. सरकार म्हणून तुम्ही कोणाचेही घर असे पाडू शकत नाही. योग्य प्रक्रिया पाळण्यात आली नाही. आमच्याकडे प्रतिज्ञापत्र आहे. त्यात कोणतीही नोटिस बजावण्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले. तुम्ही फक्त साइटवर जाऊन लोकांना माहिती दिली, असे म्हणाले.

हेही वाचा: ‘कोणी दोषी असले तरी घर पाडता…’, बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

याचिका दाखल करण्याऱ्याच्या वकिलांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तुम्ही किती घरे पाडली असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारी वकिलाला विचारला. त्यावर १२३ बेकायदा बांधकामे असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांनी ही घरे अनधिकृत होती या तुमच्या म्हणण्याला काय अधिकार आहे असा सवाल विचारला. तुम्ही १९६० पासून ५० वर्षे काय करत होता असा देखील प्रश्न त्यांनी सरकारी वकिलांना केला आहे.

तुमच्या अधिकाऱ्याने काल रात्री रस्ता रुंदीकरणासाठी पिवळ्या रंगाचे चिन्ह लावले. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच बुलडोजर घेऊन घरावर चालवला. तुम्ही नोटिसही बजावत नाही आणि घर रिकामे करण्यासाठी वेळही देत नाही. ही कारवाई कब्जा करण्यासारखीच आहे. रुंदीकरण हे केवळ निमित्त होते. या कारवाईमागे दुसरे काहीतरी कारण असू शकते अशी शंका कोर्टाने व्यक्त केली आहे.  दरम्यान या प्रकरणात चौकशी होण्याची गरज असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले. उत्तर प्रदेश सरकारने एनएचची मूळ रूंदी दाखवण्यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत. अतिक्रमण ओलखण्यासाठी तपास केला आहे याबाबत भौतिक दस्ताएवज नसल्याचे सीजीआय म्हणाले.

Web Title: Supreme court order to up government give 25 lakhs rs to the person house was demolished

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • Supreme Court
  • Uttar Pradesh
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
1

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना
2

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे
3

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
4

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.