कुलगाम – दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात हलन फॉरेस्ट एरियामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर जिल्ह्यातील हलान मंजगाम जंगलात शुक्रवारी संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, तर तीन जवान शहीद झाले आहेत. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच अचानक अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. सर्च ऑपरेशनचं रुपांतर एन्काऊंटरमध्ये झालं. या गोळीबारात तीन जवानांना गोळी लागल्याने ते शहीद झाले. तर या चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच जवानांना यश आलं आहे. (three jawan martyred in encounter with terrorists in kulgam four terrorists encounter search operation started)
Operation Halan #Kulgam
On specific inputs regarding presence of terrorists on higher reaches of Halan in Kulgam, operations launched by Security Forces on 04 Aug 23. In exchange of firing with terrorists, three personnel sustained injuries and later succumbed.
Search operations… pic.twitter.com/NJ3DZa2OpK— Chinar Corps? – Indian Army (@ChinarcorpsIA) August 4, 2023
उपचार सुरु असताना जवानांचा मृत्यू
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कुलगाम दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या 3 जवानांना उपचारासाठी श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री उशिरा तिघांचाही मृत्यू झाला. अशी माहिती इंडियन आर्मीच्या ट्विटरवरुन देण्यात आली आहे. काश्मीरमधील कुलगाम येथून शनिवारी (२९ जुलै) बेपत्ता झालेला लष्कराचा जवान जावेद अहमद वानी सापडला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांचे त्यांच्या कारमधून अपहरण केले. वानीची पोस्टिंग लेहमध्ये आहे.
चार दहशतवाद्यांचा खात्मा
पुंछ येथील सिंधरा परिसरात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. इंडियन आर्मीची स्पेशल फोर्स, नॅशनल रायफल्स आणि जम्मू-काश्ममीर पोलिसांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन केलं होतं. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये विदेशी अतिरेकीही होते. लष्कराने 25 दिवसांपूर्वी 10 दहशतवाद्यांना अटक केली होती. या फुटीरतावादी संघटना जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) आणि हुर्रियतला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काम करत होत्या. या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून नियंत्रित केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी पुंछमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं होतं.