फोटो सौजन्य- iStock
राज्यातील आदिवासींसाठी शासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2024-25 मध्येही राबविणार आहे. या योजनेसाठी 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यातील ठाणे, पालघर ,पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ,अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील 14 जिल्ह्यातील आदिवासी भागात कुपोषणाची समस्या आहे. या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” ही योजना राज्यात राबविण्यात येते.
योजनेच्या लाभार्थींची निवड:
योजनेत दिली जाणारी फळझाडे कलमे/रोपे आणि भाजीपाला बियाणे
फळझाडे व भाजीपाला लागवड योजनेत चिकू,आंबा, पेरू, दोडका, गवार, मेथी , पालक, दुधी भोपळा तसेच इतर भाजीपाला उदा.अळू, वांगी इ .स्थानिक गरजेनुसार आवश्यक मागणी असलेली फळझाडांची कलमे, रोपे आणि भाजीपाला रोपे आणि बियाणे पुरविण्यात येतात.