चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर (Ajaypur)येथे गुरुवारी रात्री दोन ट्रक आणि पेट्रोलचा टॅंकर एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे. या अपघातानतंर ट्रकला आग लागली. या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला आहे.
[read_also content=”CBI टीम लालू प्रसादच्या घरी ; ‘या’ प्रकरणी होणार चौकशी https://www.navarashtra.com/latest-news/cbi-team-at-lalu-prasads-house-nrab-282197.html”]
चंद्रपूर-मूल मार्गावरील भीषण ट्रक अपघातानंतर आग लागून चौघा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अजयपूर गावाजवळ काल (गुरुवारी) रात्री दोन ट्रक एकमेकांवर धडकून अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण आग (Fire) लागली होती. ट्रकचे टायर फुटल्याने आग भडकली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.
[read_also content=”निखत झरीनने जिंकले सुवर्ण : जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत थायलंडच्या जुटामास जितपॉन्गचा पराभव, भारताला तब्बल 4 वर्षांनंतर मिळाले सुवर्णपदक https://www.navarashtra.com/sports/nikhat-zareen-wins-gold-india-defeated-jutamas-jitpong-of-thailand-in-the-final-of-the-world-boxing-championships-india-won-the-gold-medal-after-4-years-282220.html”]






