पश्चिम बंगालमधील(west Bengal) विधानसभा निवडणूक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने जिंकली. निवडणूक(Election) निकालात भाजपाला रोखत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत आल्या. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) नंदीग्राममधून हरल्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचं समजतं. यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय राजीनाम देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
[read_also content=”नारदा प्रकरण – तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैद, कोलकाता हायकोर्टाचे आदेश https://www.navarashtra.com/latest-news/kolkata-high-court-gave-house-arrest-order-to-trunmul-congress-leaders-in-narada-scam-nrsr-132102.html”]
ममता बॅनर्जा यांच्या तृणमूल पक्षाला विधानसभेच्या २९२ जागांपैकी २१३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा राखण्यात अपयश आलं. नंदीग्राममध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. असं असलं तरी पक्षानं त्यांची नेतेपदी निवड केली.तसेच ५ मे २०२१ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता ममता दीदींना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून त्यांनी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाची निवड केली आहे.
२०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. तेव्हा सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता दीदींनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केलं होतं. तर भाजपा तिसऱ्या स्थानी होतं. २०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.






