
नात्यामध्ये कधी कधी रोमांस तर कधी कधी तू तू मै मै ही सुरूच असते. हल्लीच्या काळात आपण टेक्नॉलॉजीचा अमाप वापर करत आहोत. मोबाईलशिवाय जगणे मुश्किल झाले आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण मोबाईलवर जेव्हा तुम्ही चॅटिंग करत असता तेव्हा तुमचे इमोशन्स व्यक्त करण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीचाच वापर करत असता. पण हे कितपत योग्य आहे..??
जर तुम्ही मोबाईलवरून चॅट करत असाल तर तुम्हाला तुमचे सगळे इमोशन्स व्यक्त काहीच गरज नाही. शक्य तितके समोरासमोर राहूनच एकमेकांशी बोलले पाहिजे.
एकतर तुम्ही चॅटिंग करत असताना तुमचे इमोशन्स समोरच्याला किंवा समोरच्याचे इमोशन्स तुम्हाला स्पष्टपणे कळून येत नाहीत. समोरची व्यक्ती जे लिहीत आहे तसेच त्यांना वाटते आहे का, हे तुम्हाला अजिबात कळत नाही. म्हणून तुम्ही केव्हाही नुसते चॅटिंगवर अवलंबून न राहता, त्या व्यक्तीशी फोनवर किंवा प्रत्यक्षात बोलले पाहिजे. जेणेकरून त्यांचा बोलण्याचा टोन तुम्हाला कळू शकेल. प्रत्यक्षात जेवढ आपण एकमेकांना व्यक्त होता तेवढ चॅटिंग स्पष्ट बोलू शकत नाही, त्याच बरोबर आपण काही गोष्टी बोलू शकत नाही, मोबईल बोलने योग्य वाटत नाही. मोबईलचा वापर कितपत करावा हे शेवटी आपल्यावर असत, वापर आणि वेळाची मार्यदा हे आपण ठरवल पाहिजे.