Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का? जाणून घ्या यामागील कारण आणि रेबीजची लक्षणे

कुत्रा चावल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास रेबीज होण्याची जास्त शक्यता असते. रेबीज झाल्यानंतर मानवाच्या थेट मेंदूवर परिणाम होतो, त्यामुळे शरीरात महाभयंकर लक्षणे दिसू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 08:37 AM
रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का? जाऊन घ्या यामागील कारण आणि रेबीजची लक्षणे

रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का? जाऊन घ्या यामागील कारण आणि रेबीजची लक्षणे

Follow Us
Follow Us:

रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का?
रेबीजची लक्षणे?
कुत्रा चावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी?

जगातील सगळ्यात घातक आणि जीवघेणा आजार म्हणजे रेबीज. घराच्या बाहेर खेळताना किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे कुत्रा चावल्यानंतर किंवा नख लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष केल्यास शरीरसंबंधित अतिशय गंभीर आजाराची लागण होऊ शकते. कुत्रा चावल्यानंतर माणूस कुत्र्यासारखा वागतो किंवा भुंकतो, असे समज गैरसमज कायमच मानले जातात. प्रामुख्याने रेबीज हा आजार पिसाळलेला कुत्रा, मांजर किंवा माकड चावल्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. या विषाणूचा थेट परिणाम मानवाच्या मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर होतो. त्यामुळे कुत्रा चावल्यानंतर सगळ्यात आधी जखम डेटॉल किंवा डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे माणसाचा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. या आजाराला सायलंट किलर, असे म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – istock)

काखेत कायमच वेदना होतात? ब्रेस्ट कॅन्सरच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच करा उपचार

आपल्यातील अनेकांना कायमच वाटते की, कुत्रा चावल्यानंतर माणसं कुत्र्यासारखी भुंकतात, कुत्र्यासारखी वागतात. पण डॉक्टरांच्या मते, रेबीज झालेल्या रुग्णाच्या शरीरात होणाऱ्या वेदनांमुळे आवाजावर परिणाम होतो. तसेच कुत्रा चावलेल्या व्यक्तीला रेबीज झाल्यास त्याच्या मेंदूवर थेट परिणाम होऊन शारीरिक संतुलन बिघडून जाते. त्यामुळे कुत्रा चावल्यास किंवा नख लागल्यास क्षणाचाही विलंब न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का?यामागील कारण आणि रेबीजची लक्षणे.

रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का?

डॉक्टरांच्या मते, रेबीज झालेल्या व्यक्तीच्या शरीरात असंख्य बदल होतात. मेंदूवर परिणाम झाल्यामुळे स्नायूंचे आकुंचन होतात, ज्यामुळे रुग्णाला पाणी पिणे सुद्धा कठीण होऊन जाते. रेबीजमुळे हायड्रोफोबिया होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार मेंदूच्या नसांवर थेट परिणाम करतो. ज्याच्या परिणामामुळे रुग्णांच्या वागणुकीमध्ये अनेक बदल दिसू लागतात. पाणी पिण्याची भीती वाटणे, पाणी दिसल्यास घाबरून किंचाळणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Liver Day 2026: वेळीच करा उपाय, टाळा Liver Cancer, तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला

रेबीज झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

रेबीज झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात. ताप, डोकेदुखी, अस्वस्थता, चिंता, घशात पेटके येणे, गिळण्यास त्रास होणे, पाण्याची भीती, जास्त लाळ गळणे, मानसिक गोंधळ, खूप जास्त राग येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. कारण रेबीज झाल्यानंतर मेंदूला मोठी सूज येते. ही सूज रुग्णाची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करून टाकते. बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे ओरडणे किंवा विचित्र हालचाली,सतत चिडचिड, कायमच गोंधळल्यासारखे वाटू लागते. रेबीज झाल्यानंतर रुग्णांच्या लाळग्रंथींवर ताबा राहत नाही आणि घशाच्या स्नायूंमुळे गिळणे कठीण होऊन जाते. शरीरात दिसणारी ही वरील लक्षणे पाहिल्यामुळे रुग्ण पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोय, असे सगळ्यांचं वाटते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेबीज झाल्यानंतर माणूस खरंच कुत्र्यासारखा भुंकतो का?

    Ans: नाही, माणूस प्रत्यक्षात कुत्र्यासारखा भुंकत नाही. पण Rabies मुळे मेंदूवर परिणाम होतो आणि व्यक्तीमध्ये आक्रमकता, असामान्य वर्तन आणि आवाजात बदल दिसू शकतो.

  • Que: रेबीज म्हणजे काय?

    Ans: रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यामुळे पसरतो.

  • Que: रेबीज झाल्यास काय करावे?

    Ans: ताबडतोब जखम साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा आणि डॉक्टरांकडे जाऊन लस (vaccine) घ्या. विलंब जीवघेणा ठरू शकतो.

Web Title: Do humans really bark like dogs after rabies know the truth causes and symptoms of rabies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • mental health
  • Street dogs

संबंधित बातम्या

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
1

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
2

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
3

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
4

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.