
Water retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? 'हे' उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम
शरीरात पाणी कशामुळे साचून राहते?
वॉटर रिटेन्शन म्हणजे काय?
वॉटर रिटेन्शन करण्यासाठी कोणते उपाय करावेत?
वजन करण्याऱ्यांसाठी वजन काट्यावर उभं राहिल्यानंतर आलेले वजन पाहून अनेकांना धक्काच बसतो. झपाट्याने १ किंवा २ किलो वजन वाढल्यानंतर चिंता व्यक्त केली जाते. पण हे अचानक वाढलेले वजन नसून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये साचून राहिलेले पाण्याचे प्रमाण आहे. शरीराच्या हात, पाय, घोटे आणि पोटाच्या भागात सूज जाणवण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. मानवी शरीरात ६० टक्के पाणी असते. शरीराच्या पेशींमध्ये किंवा उतींमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी साचून राहते, त्या स्थितीला वॉटर रिटेन्शन असे म्हंटले जाते. शरीरात पाणी साचून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीर केवळ फुगल्यासारखे वाटते. यामुळे कपडे घट्ट होणे, अंगावर व्यवस्थित कपडे न बसने इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात साचून राहिलेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. त्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसू लागतो. बऱ्याचदा आहारात अनेकांना खूप जास्त प्रमाणात मीठ खाण्याची सवय असते. मिठातील सोडियम पाण्याला जखडून ठेवते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त मीठ खाल तेवढेच शरीरात पाण्याचे प्रमाण वाढू लागेल. शरीरात १ ग्रॅम ग्लायकोजेन ३ ते ४ ग्रॅम पेक्षा जास्त पाणी तयार करते. यामुळे शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊन पाण्याची पातळी वाढू लागते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शरीरात पाणी साचून राहते.
वजन कमी करताना किंवा दीर्घकाळ निरोगी राहायचे असल्यास आहारात कमीत कमी प्रमाणात मीठ खावे. मिठाच्या अतिसेवनामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. लोणचे, पापड आणि बाहेरील अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ असते. त्यामुळे हे पदार्थ खावे टाळावे. कमी मिठाचे सेवन केल्यास किडनी शरीरातील विषारी घटक पाण्यावाटे बाहेर काढून टाकेल. याशिवाय पोटॅशियम हे सोडियमच्या विरुद्ध काम करते. याशिवाय आहारात केळी, एवोकॅडो, पालक आणि रताळी इत्यादी पोटॅशियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे लघवीवाटे विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्यावेळी कमी पाण्याचे सेवन केले जाते तेव्हा शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते. यामुळे शरीरात पाण्याचा साठा वाढतो. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे लघवीवाटे विषारी घटक बाहेर पडून जातात.
दैनंदिन आहारात काकडी, लिंबू पाणी, आले आणि ग्रीन टी नैसर्गिक डाय्युरेटिक्स पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच जास्त व्यायाम किंवा घाम गाळल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच शरीराचे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे द्रवपदार्थ पुन्हा प्रवाहित होतात. त्यामुळे नियमित भरपूर पाण्यासोबत पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा आवश्यक आहे.
Ans: वॉटर रिटेन्शन म्हणजे शरीरात अतिरिक्त पाणी साठणे. यामुळे सूज येणे, वजन वाढल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.
Ans: जास्त मीठाचे सेवन, कमी पाणी पिणे, हार्मोनल बदल, कमी शारीरिक हालचाल आणि काही औषधांमुळे हा त्रास होऊ शकतो.
Ans: खरं तर हा चरबी नसून पाण्याचे प्रमाण वाढते. योग्य उपाय केल्यास हे कमी होऊ शकते आणि शरीर पुन्हा नॉर्मल दिसू शकते.