Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला,ताप आणि अतिसाराच्या तक्रारी, पालकांना तज्ज्ञांचा सल्ला

पावसाळा जितका सुखद आहे तितकेच आजारांनाही आमंत्रण मिळते. विशेषतः मुलांमध्ये सर्दी - खोकला आणि तापाचे पडसाद अधिक उमटतात. अशावेळी पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 30, 2025 | 10:12 AM
पावसाळ्यात सर्दी खोकला का होतो (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यात सर्दी खोकला का होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शाळेत एकमेकांच्या सहवासात आल्याने विशेषत: या काळात लहान मुलांना पटकन सर्दी-खोकला, ताप, जुलाब अशा समस्या उद्भवतात. मुंबई पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आरोग्य समस्यांनी डोकं वर काढलं आहे. प्रामुख्याने २ ते १० वयोगटातील मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. 

या प्रकारचे आजार जरी सामान्य असले तरी ते अत्यंत चिंताजनक आहेत कारण ते सहजपणे पसरतात आणि कालांतराने उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मुलांमधील संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असून पालकांनी मुलांच्या योग्य ती खबरदारी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला दिला आहे. 

संसर्गाचे प्रमाण वाढले

संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले असून हवेतील आर्द्रता, सांडपाणी साचणे, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने आणि १० वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. मुलं खूप संवेदनशील असतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवत असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

नक्की कारणं काय?

दूषित पाणी, तापमानात झालेली घट आणि अस्वच्छतेमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. ओपीडीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये दररोज सर्दी आणि खोकल्याचे सुमारे १५ रुग्ण, अतिसाराचे ४ रुग्ण आणि विषाणूजन्य तापाचे ५ रुग्ण आढळत आहेत. जर वेळीच उपचार केले तर यामुळे डिहायड्रेशन, ब्राँकायटिस किंवा इतर संसर्गासारख्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात ज्या श्वसन कार्यांवर परिणाम करू शकतात अशी प्रतिक्रिया पुण्यातील लुल्लानगर येथील मदरहुड हॉस्पिटल्समधील सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यातील आजार

पावसाळा अनेकदा नेहमीच्या सर्दी आणि तापापेक्षाही अधिक आजार घेऊन येतो. गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जलजन्य आजार तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे डासांमुळे होणारे आजार हे साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे वाढतात. या काळात त्वचेचे संक्रमण, पुरळ उठणे, बुरशीजन्य संसर्ग आणि ब्राँकायटिस आणि न्यूमोनियासारख्या श्वसन समस्या देखील झपाट्याने वाढतात.

सर्दी-खोकल्याला म्हणा बाय-बाय! 5 घरगुती उपायांनी मुळापासून होईल सुटका

पालकांनी काय करावे

पालकांना प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक करणे आवश्यक आहे. उकळून थंड केलेले पाणी पिणे, उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, सॅनिटायझर्स आणि जंतुनाशकांचा वापर करुन स्वच्छतेची पुरेपुर काळजी घेणे आणि बदलत्या हवामानानुसार मुलांचे शरीर पुर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालणे यामुळे संसर्गापासूम दूर राहण्यास मदत होते. डास प्रतिबंधकांचा वापर करणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे आणि घराभोवती साचलेले पाणी रोखणे हे देखील महत्त्वाचे असे प्रतिबंधात्मक उपाय आहेत अशी माहिती डॉ. अतुल पालवे यांनी दिली.

अधूनमधून मुसळधार पाऊस पडत असताना, आरोग्य तज्ज्ञ कुटुंबांना आठवण करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत की त्यांच्या मुलांना पावसाळ्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी जागरूकता आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सर्दी खोकला झाल्यानंतर ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा आयुर्वेदिक चहा, घरगुती उपाय आरोग्यासाठी ठरतील प्रभावी

Web Title: Due to monsoon children are complaining of cold cough fever and diarrhea expert advice to parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • cold and cough home remedies
  • Health Tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
1

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
2

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
3

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
4

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.