Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात घरबसल्या वाढवा शरीराची Immunity! रोजच्या आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, कोरोना होईल गायब

सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2025 | 08:52 AM
पावसाळ्यात घरबसल्या वाढवा शरीराची रोगप्रतिकारशक्ती! रोजच्या आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन

पावसाळ्यात घरबसल्या वाढवा शरीराची रोगप्रतिकारशक्ती! रोजच्या आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण असते. या दिवसांमध्ये अनेक लोक बाहेर फिरायला जातात. मात्र वातावरणातील दमट आणि कोरडेपणा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या इत्यादी अनेक गंभीर आजारांची शरीराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र सतत गोळ्या औषंधाचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करावा.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, मधुमेहासह वाढलेला उच्च रक्तदाब राहील कायम नियंत्रणात

पावसाळ्यातील आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात घरगुती आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही कायमच फिट, तंदुरुस्त राहाल. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते, रक्त शुद्ध होण्यास मदत होते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.

हळद:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे पदार्थाची चव वाढते. हळदीमध्ये असलेले गुणधर्म शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद साथीच्या आजारांपासून शरीराचे रक्षण करते. हळदीमधील ‘कर्क्युमिन’ शरीरात विषारी घटक बाहेर काढून टाकतात. सकाळी उठल्यानंतर एक चमचा मधात हळद मिक्स करून खाल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामुळे शरीराला आलेली सूज कमी होईल, श्वसनमार्ग स्वच्छ राहील आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल.

आल्याचा चहा:

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी दुधाचा चहा न पिता आल्याच्या चहाचे किंवा काढ्याचे सेवन करावे. या काढ्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासाठी एक ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात एक तुकडा आलं, तुळशीचं पान, दालचिनी पावडर आणि काळीमिरी टाकून चहा व्यवस्थित उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध टाकून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.

रात्री अचानक लागलेली भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाण्याऐवजी करा ‘या’ पदार्थाचे सेवन, राहाल कायम निरोगी

लसूण:

आरोग्यासाठी लसूण अतिशय फायदेशीर आहे. लसूण खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अँटीबायोटिक व अँटीव्हायरल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यात लसूण काढ्याचे सेवन करावे. सर्दी, खोकला झाल्यानंतर तुम्ही तुपात भाजलेला लसूण खाऊ शकता. यामुळे खोकला कमी होईल. साथीच्या आजारांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी लसूण काढ्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: During the rainy season increase the immunity of the body at home consume these nutritious foods in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • Ayurvedic Herbstips
  • healthy food
  • monsoon care

संबंधित बातम्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
1

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

‘या’ शाहाकारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढेल Vitamin B12, थकवा- कमजोरी होईल दूर
2

‘या’ शाहाकारी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढेल Vitamin B12, थकवा- कमजोरी होईल दूर

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे
3

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
4

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.