
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर...
रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
कुठे आहे बीच?
गुजरातमधील सुरत येथून साधारण २० किलोमीटर अंतरावर एक शांत आणि सुंदर बीच आहे ज्याचे नाव आहे डुमस बीच. दिवसा हा समुद्रकिनारा जितका सुंदर दिसतो तितकाच तो रात्रीच्या सुमारास आणखी भयानक वाटू लागतो. हेच कारण आहे की, या समुद्रकिनाऱ्याला देशातील हाँटेड बीच असे म्हटले जाते. ठिकाणाची खासियत म्हणजे इथे काळ्या रंगाची वाळू पाहायला मिळते. बहुतेक समुद्रकिनाऱ्यांवर सोनेरी वाळू असते, पण इथली वाळू गडद काळी आहे. लाटा, काळ्या जमिनीचा अथांग विस्तार आणि संध्याकाळनंतर पसरणारी शांतता यांमुळे या ठिकाणाला एखाद्या भयपटातील दृश्यासारखा अनुभव येतो. स्थानिक लोकांची मान्यता आहे की, इथे पूर्वी एक हिंदू स्मशानभूमी होती. अनेक वर्षांपूर्वी इथे पूर्वी अंतिम संस्कार केले जात होते.
स्थानिकांनी काय सांगितलं?
अनेक लोकांनी दावा केला आहे की, रात्रीच्या वेळी इथे विचित्र आवाज ऐकू लागतात. काही पर्यटकांच म्हणणं आहे की, संध्याकाळनंतर इथे आपला कुणी तर पाठलाग करत आहे असा भास होऊ लागतो. अनेकदा इथे फिरणारे कुत्रेही अचानक गायब होतात. यामुळेच रात्रीच्या वेळी लोक इथे जायला फार घाबरतात. तथापि, या गोष्टींचा काही वैज्ञानिक पुरुवा नाही आहे. पण डुमच बीचच्या कथा आजही लोकांच्या मनात भितीू निर्माण करते. स्थानिकांनी असाही दावा केला आहे की, इथे काही लोक रहस्यमयरित्या गायब झाले आहेत. अशा दंतकथाच या ठिकाणाला आणखी भयभीत बनवतात. अधिकृत पुरावा नसला तरी कथांच्या जोरावर अनेकजण रात्रीच्या सुमारास इथे जाण्यास खूप घाबरतात.
Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
भय आणि रहस्याच्या कथा कितीही लोकप्रिय असल्या तरी समुद्रकिनाऱ्याचे साैंदर्य मात्र अनेकांना याकडे आकर्षित करत असते. दिवसा लोक इथे फिरायला जातात परंतु संध्याकाळनंतर इथे कुत्रही फिरकत नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, येथील काळी वाळू नैसर्गिक खनिजांमुळे असू शकते आणि रात्री ऐकू येणारे आवाज हे सागरी वाऱ्यांचा आणि लाटांचा परिणाम असू शकतात.