(फोटो सौजन्य: Pinterest)
रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
कोणी केली होती निर्मिती?
जंतर-मंतरला १७२४ मध्ये बांधण्यात आले होते. महाराजा सवाई जय सिंह द्वितीय यांच्या मदतीने याची निर्मिती करण्यात आली. त्यांना गणित आणि खगोलशास्त्रात फार रस होता आणि हेच कारण आहे की इमारतीची बांधणी काहीशी वेगळ्या प्रकारे त्याकाळी केली. याचे मूळ कारण म्हणजे त्यावेळी घड्याळ नव्हते ज्यामुळे दिवस आणि रात्रीचे मोजमाप करता येत नव्हते. दिवस-रात्रीचे मोजमाप करता यावे यासाठी खरंतर जंतर-मंतरची निर्मिती करण्यात आली होती.
सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाने निश्चित व्हायची वेळ
जंतर-मंतरच्या आत अशा प्रकारचे यंत्र बनवण्यात आले होते जे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश पाहून वेळ सांगायचे. त्या काळात, खगोलशास्त्रीय सारण्या आणि दिनदर्शिकांमध्ये फार चूका होत्या, ज्यामुळे सणांच्या तारखा अचूकपणे ठरवणे कठीण व्हायचे. यामुळेच दिल्लीनंतर इतर राज्यांमध्येही जंतर-मंतरचे निर्माण करण्यात आले.
ऋतूचीही मिळते माहिती
जंतर-मंंतर त्याकाळी सूर्य आणि चंद्र ग्रहणाची माहिती देण्यासाठी वापरले जात होते. याच्या आतमध्ये काही प्रमुख यंत्र बसवण्यात आले आहेत जे वेळ आणि ग्रहांची स्थिती सांगण्याचे काम करतात. इथे एकूण चार ४ यंत्र बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक यंत्र एका विशिष्ट वस्तूची स्थिती आणि दिशा दर्शवते.
Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
कोणते होते ते ४ यंत्र
सम्राट यंत्र – हे जगातील सर्वात मोठ्या दगडी सूर्यघड्याळ्यांपैकी एक आहे. याचा वापर स्थानिक वेळ, सूर्याची उंची आणि खगोलीय वस्तूंची स्थिती मोजण्यासाठी केला जातो.
जय प्रकाश यंत्र – हे यंत्र दोन अर्धगोलाकार रचनेपासून तयार करण्यात आला आहे. याच्या मदतीने सूर्य, तारे आणि अन्य खगोलीय वस्तूंचे अचूक स्थान ओळखण्यास मदत होते.
राम यंत्र – हे यंत्र म्हणजे दोन सिलेंडरसारख्या संरचनांचा समूह आहे. कोणत्याही खगोलीय वस्तूंची उंची आणि दिशा मोजण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो.
मिश्र यंत्र – हे पाच वेगवेगळ्या यंत्रांचे एक संयुक्त रुप आहे. याचा वापर वर्षातील सर्वात मोठ्या आणि लहान दिवसाची मोजणी करण्यासाठी केला जातो. दुपारची वेळ आणि अन्य खगोलीय स्थिंतींची गणना करण्यासाठी याचा वापर होतो.






