
Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला
Monsoon Recipe : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग घरी नक्की बनवा हा आयुर्वेदिक काढा
भाज्यांना गरजेपेक्षा जास्त शिजवणे
भाज्यांना गरजेपेक्षा जास्त वेळ हाय फ्लेमवर शिजवल्याने त्यांच्यातील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कमी होऊन जातात. यामुळेच भाज्यांना त्यांच्या गरजेइतकंच शिजवावे ज्यामुळे त्यांची चव, रंग आणि पोषणमूल्ये टिकून राहतील.
गरजेहून जास्त मीठ किंवा मसाले टाकणे टाळावे
जेवणात कधीही अतिरिक्त मसाले किंवा जास्तीच्या मीठाचा वापर करु नये. गरजेहून जास्तीचे प्रमाण आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. माफक प्रमाणात मीठ आणि मसाले वापरल्याने जेवण अधिक चवदार आणि संतुलिन बनते.
पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलाचा वापर करणे
एकावेळी वापरलेल्या तेलाचा जर तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळे जेवणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळेच तळण्यासाटी वापरलेल्या तेलाचा दोन-तीन वेळा वापर करावा. तेल वापरुन वापरुन काळे झाले असेल तर त्याचा वापर टाळा.
चुकीच्या पद्धतीने अन्न साठवणे
फळ, भाज्या, डाळ आणि मसाल्यांना योग्य तापमानावर आणि स्वच्छ, कोरड्या जागी साठवणे फार गरजेचे असते. चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थ साठवल्याने त्यात ओलावा निर्माण होऊ शकतो. यामुळे अन्नपदार्थाच्या गुणवत्तेवर आणि ताजेपणावर परिणाम होतो.
स्वयंपाकघरातील कोणती सवय अन्नपदार्थांना हेल्दी ठेवू शकते?