
कांदा भजी आणि पावसाळ्याचा काय संबंध
माधुरी दीक्षितने सांगितलेली कांदा भजीची रेसिपी नक्की बनवून पहा,भजी होतील कुरकुरीत
कांदा भजी खावीशी वाटण्यामागे कारण
पावसाळ्यात बाहेरचे वातावरण थंड असते. अशा वेळी शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला गरम आणि उष्णता देणारे अन्न खावेसे वाटते आणि यात सर्वात आधी तळलेले गरमागरम पदार्थ डोळ्यासमोर येतात
पावसामध्ये वातावरणात एक प्रकारचा मंदपणा असतो, ज्यामुळे आपला मूड कधीकधी आळसवाणा, उदास आणि कंटाळवाणा होऊ शकतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत डोपामाईन म्हटलं जातं. पण अशावेळी गरम, मसालेदार आणि कुरकुरीत भजी खाल्ल्याने मेंदूत असणारे डोपामाइन नावाचे आनंदी संप्रेरक स्रवते, ज्यामुळे आपल्याला हायसे वाटते आणि थोडासा ताजेपणा येतो.
हेदेखील अजून एक कारण
कुरकुरीत आणि चविष्ट भजी खाताना येणारा कुरकुरीत आवाज आणि तिखट-चमचमीत चव मनाला आणि जिभेला तृप्त करते अर्थातच आपल्या जिभेचे चोचले पुरवते हे काही वेगळं सांगायला नको.
याशिवाय आपल्याकडे लहानपणापासूनच पावसाळ्यात भजी खाण्याची एक परंपराच झाली आहे. त्यामुळे पाऊस पडताच आपोआप चहा आणि भजीची आठवण येते आणि आपसुकच पाय स्वयंपाकघराकडे वळतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांद्याचे आरोग्यदायी फायदे. कांद्यामध्ये असणारे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि बेसन आपल्याला ऊर्जा देते. म्हणूनच पावसाळ्यात कांद्याची भजी करून खाल्ली जाते.
आता तुम्ही कसली वाट पाहताय. पावसामुळे घरीच असाल तर लगेच फक्कड चहा आणि कांदा भजीचा बेत आखा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा
Monsoon Special: बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत कांदा भजी, चवीला एकदम भारी, वाचा रेसिपी