Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तासातच मेलो असतो…’, मांस तुटून रक्तात मिसळत होतं, बोटं झाली कडक; Tilak Verma ला कोणता होता आजार?

आशिया कप 2025 मध्ये सर्वांचे मन जिंकणाऱ्या युवा खेळाडू तिलक वर्माने आपल्या आरोग्याबाबत एक मोठा खुलासा केलाय. 2022 मध्ये त्याची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्याला गंभीर आजार झाला होता, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 27, 2025 | 09:50 AM
तिलक वर्माला कोणता होता आजार, स्वतः केला खुलासा (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

तिलक वर्माला कोणता होता आजार, स्वतः केला खुलासा (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय क्रिकेटर तिलक वर्माला कोणता आजार होता 
  • काय आहे नक्की रॅबडोमायलोसिस
  • जाणून घ्या अधिक माहिती 
२०२५ च्या आशिया कपमध्ये भारताला विजय मिळवून देणारा तरुण क्रिकेटपटू तिलक वर्माने त्याच्या आयुष्यातील एक मोठे रहस्य उलगडले आहे. त्याने TOI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की २०२२ मध्ये त्यांची तब्येत अचानक बिघडली. तिलकला रॅबडोमायोलिसिस नावाचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे स्नायू तुटतात आणि रक्तप्रवाहात मिसळतात, जर त्वरीत उपचार केले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

पहिल्या IPL हंगामानंतर, तिलकने त्याची कामगिरी सुधारण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांची तब्येत अचानक बिघडली. तिलक वर्माने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले की आयपीएलनंतर त्याला अधिक तंदुरुस्त व्हायचे होते. या काळात त्याने त्याच्या शरीरावर इतका दबाव आणला की त्यांना रॅबडोमायोलिसिस नावाचा गंभीर आजार झाला.

TOI च्या वृत्तानुसार, तिलक म्हणाला की, “मी यापूर्वी कधीही याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. मला इतके तंदुरुस्त व्हायचे होते. त्या काळात मला रॅबडोमायोलिसिस झाला. माझे स्नायू तुटू लागले आणि माझी प्रकृती बिघडू लागली.” तिलकला हा आजार कसा झाला, तो किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.

ओव्हरट्रेनिंगमुळे बिघडले आरोग्य 

तिलक वर्माला तंदुरुस्तीचे इतके वेड लागले होते की त्याने शरीराला विश्रांती देण्याकडे दुर्लक्ष केले. तो दररोज जिममध्ये जाऊन कठोर प्रशिक्षण घेत होता आणि बर्फाने आंघोळदेखील करत होता, परंतु शरीराला आराम देण्याकडे मात्र त्याने दुर्लक्ष केले आणि त्याने स्वतः स्पष्ट केले की, “विश्रांतीच्या दिवशीही मी जिममध्ये जात असे. मला सर्वात तंदुरुस्त खेळाडू आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक व्हायचे होते. पण यामुळे माझ्या स्नायूंवर जास्त ताण आला आणि यामुळे माझ्या नसा अत्यंत कडक झाल्या’’

लिव्हरमध्ये वाढलेल्या चरबीमुळे उद्भवेल कॅन्सरचा धोका! डॉक्टर सौरभ सेठीने सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे करा नियमित सेवन

बांगलादेशमध्ये भयानक परिस्थिती 

बांगलादेश विरुद्ध भारताच्या ए-सीरीज सामन्यादरम्यान, तिलकने स्वतःच्या शरीराला इतके पुश केले की, त्याचे शरीर अचानक थकले. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले, त्याच्या बोटांनी पूर्णपणे हालचाल करणे बंद केले आणि त्याचे संपूर्ण शरीर दगडासारखे कडक झाले. तिलकने सांगितले की, त्याची प्रकृती इतकी बिकट झाली की त्याला ताबडतोब फलंदाजी थांबवावी लागली. त्याला स्वतःची बोटंही वाकवता येत नव्हती, म्हणून त्यावेळी त्याचे हातमोजे कापून काढावे लागले होते’’ आणि हा क्षण त्याच्यासाठी अत्यंत भयानक होता. 

वेळीच उपायाने तिलकचा वाचला जीव

जेव्हा मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांना तिलकच्या गंभीर प्रकृतीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी संपर्क साधला आणि तिलकला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की काही तासांचा विलंबदेखील परिस्थिती आणखी बिकट करू शकला असता. या कठीण काळात तिलकची आई त्याच्यासोबत होती आणि तिने त्याला सतत पाठिंबा दिला आणि या आजारातून बाहेर पडण्यास मदत झाली. 

रॅबडोमायलोसिस म्हणजे काय? लक्षणे घ्या जाणून 

रॅबडोमायलोसिस ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये शरीराचे स्नायू वेगाने तुटतात, ज्यामुळे हानिकारक पदार्थ रक्तप्रवाहात सोडले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती कठोर व्यायाम करते, स्नायूंवर जास्त ताण येतो आणि शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा हे अनेकदा घडते.

  • जेव्हा तुम्हाला तीव्र स्नायू दुखणे, सूज येणे किंवा जडपणा जाणवतो तेव्हा रॅबडोमायलोसिस शरीरात काहीतरी बिघाड असल्याचे दर्शवू शकते
  • कधीकधी, स्नायू खूप कमकुवत होतात, ज्यामुळे कडकपणा येतो
  • लघवीमध्ये बदलदेखील होऊ शकतात, जसे की क्वचितच किंवा लघवीचे उत्पादन होत नाही आणि त्याचा रंग गडद किंवा चहासारखा होऊ शकतो
  • डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे आणि अत्यंत थकवा देखील येऊ शकतो. हा आजार धोकादायक आहे कारण जेव्हा स्नायू तुटतात तेव्हा रक्तप्रवाहात सोडलेले हानिकारक पदार्थ मूत्रपिंडांवर दबाव आणू शकतात
जर त्वरीत उपचार केले नाहीत तर मूत्रपिंडाचे नुकसान, शरीरात मीठ-खनिज असंतुलन आणि हृदयाच्या लयीत अडथळा येऊ शकतो.

लघवी करताना वारंवार फेस येत असेल तर वेळीच व्हा सावध! किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

FAQs (संबंधित प्रश्न) 

१. रॅबडोमायोमा कशामुळे होतो?

TSC1 किंवा TSC2 जनुकातील उत्परिवर्तन (बदल) असलेल्या बाळाला ट्यूबरस स्क्लेरोसिस कॉम्प्लेक्स असतो, ज्यामुळे रॅबडोमायोमा देखील होऊ शकतो. मुलाला पालकांकडून हे दोषपूर्ण जनुक वारशाने मिळू शकते किंवा उत्परिवर्तन आपोआप विकसित होऊ शकते.

२. रॅबडोमायोमाचा उपचार काय आहे?

RMS असलेल्या बहुतेक लोकांना ट्यूमर काढून टाकण्यासाठी बायोप्सी शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. रॅबडोमायोसारकोमा (RMS) च्या उपचारांचा केमोथेरपी हा एक महत्त्वाचा भाग आहे. जरी शस्त्रक्रियेने सर्व कर्करोग काढून टाकल्याचे दिसून आले तरी, केमोथेरपीशिवाय तो परत येण्याची शक्यता असते.

Web Title: Indian cricketer tilak verma revealed about his battle with rhabdomyolysis overtraining problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • health care news
  • health issues
  • Tilak Verma

संबंधित बातम्या

ग्रामीण आरोग्यसेवा अभ्यासक्रम! १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स; प्रमुख संस्था कोणत्या?
1

ग्रामीण आरोग्यसेवा अभ्यासक्रम! १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स; प्रमुख संस्था कोणत्या?

सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा
2

सततच्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.