
Malaria झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न करणे ठरेल धोक्याचे!
दिल्लीमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २८ जुलैपर्यंत २७७ मलेरिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील ५ वर्षांमध्ये यंदाच्या वर्षी मलेरियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. मलेरिया झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष दिल्यास उपचार करणे अतिशय सोपे होते. पण शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते.
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
मलेरिया म्हणजे काय?
मलेरिया हा एक परजीवी (parasite) मुळे होणारा आजार आहे, जो प्लास्मोडियम (Plasmodium) नावाच्या परजीवीमुळे होतो. हा परजीवी मादी ऍनोफिलीस (Anopheles) डासांच्या चावण्याने माणसांमध्ये पसरतो.
मलेरियाची लक्षणे काय आहेत?
ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, कधीकधी मळमळ आणि उलट्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.