
अंमली पदार्थांच्या विळख्यात तरूणाई, काय सांगतात प्रेमानंद महाराज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्रामम/iStock)
प्रेमानंद महाराजांचा विश्वास आहे की, मुलांमध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अन्यथा, अनेक सुशिक्षित आणि समजूतदार मुले अंमली पदार्थांच्या व्यसनासारख्या वाईट सवयींमध्ये अडकून आपले भविष्य उद्ध्वस्त करतात. यासाठी त्यांनी पालकांनाही मार्गदर्शन केले आहे. मुलांना नक्की कोणती शिकवण द्यावी याबाबत त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे.
पहा व्हिडिओ
अभ्यासासोबत प्रवचन द्या
प्रेमानंद महाराजांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितले की, आधुनिक शिक्षणाव्यतिरिक्त, शिक्षकांनी दिवसातून किमान पाच मिनिटे का होईना, एखाद्या संत, महात्मा किंवा महान व्यक्तीचे प्रवचन मुलं ऐकतील याची खात्री करावी. त्यांनी ब्रह्मचर्य आणि पवित्रतेचे महत्त्वही समजावून सांगावे. मुलांना आपली संस्कृती काय आहे याबाबत अधिक ज्ञान द्यावे आणि त्याचे परिणाम काय होतात हेदेखील सांगावे असं म्हटलं आहे.
Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध
व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगा
प्रेमानंद महाराज यांनी पुढे सांगितलं की, मुलांना व्यसनमुक्त जीवनाचा आनंदही शिकवला पाहिजे. याबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते यावर जोर देतात की जेव्हा मुलांना हे शिकवले जाईल, तेव्हाच त्यांच्यात खरी सुधारणा शक्य होईल. केवळ आधुनिक शिक्षण मुलांमध्ये सुधारणा घडवू शकत नाही. उच्चशिक्षित पदवीधरांनी अमली पदार्थांच्या व्यसनामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. यातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पुढची पिढी खराब होऊ शकते.
प्रेमानंद महाराज सांगतात की, अनेक उच्चशिक्षित पदवीधर आणि उच्च पदव्या मिळवलेले विद्यार्थी अथवा तरूण मुलांनीही अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकून आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. ते सांगतात की, त्यांना अशी अनेक मुले भेटली आहेत, जी अभ्यासात खूप हुशार आणि बुद्धिमान होती, पण अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडली. ते अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेतात आणि व्यसनात अडकून राहतात यामुळे पुढे काहीही करण्याची त्यांची तयारी नसते आणि कमी वयातच स्वतःचा जीव गमावून बसतात.
चोरीचा मार्ग अवलंबतात
काही तरूण मुलांना जर अमली पदार्थ मिळाले नाहीत, तर ते चोरीचा मार्ग अवलंबतात. ते आपल्या पालकांनाही त्रास देतात, पण अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांना पैशांची गरज असते आणि पैसे वेळेवर हातात न मिळाल्यास वा त्याच वेळी अंमली पदार्थ न मिळाल्यास कोणत्याही थराला अशा व्यक्ती पोहचू शकतात आणि त्यामुळे भविष्य खराब होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्र काम केले पाहिजे, असंही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.
प्रेमानंद महाराजांनी यातून असा निष्कर्ष काढला की, मुलांमध्ये ही समस्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, शिक्षक आणि पालकांनी एकत्र सहकार्य करून मुलांना आधुनिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
Parenting Tips: Teenage मुलींना वडिलांनी चुकूनही विचारू नये ‘हे’ प्रश्न, काय होतो परिणाम