Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व काय? कोणत्या जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत?

Diwali 2025 Celebration: राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात दिवाळी साजरी केली जात आहे. मात्र, या सणाचं सामाजिक आणि धार्मिक महत्त्व नेमकं काय आहे? आणि आजही जुन्या परंपरा कशा जिवंत आहेत, हे जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 22, 2025 | 12:49 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

Happy Diwali 2025: हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. या दिवसात आपण आपल्या प्रियजनांना भेटतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो आणि त्यांना भेटवस्तू सुद्धा देतो. दिवाळीत प्रत्येक घर आकर्षक रोषणाईने झगमगून जाते. तसेच या सणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील होते. दिवाळीला जसे धार्मिक महत्व आहे तसेच सामाजिक महत्व सुद्धा आहे.

दिवाळीचे धार्मिक महत्त्व म्हणजे असत्यावर सत्याचा विजय, जसे की रावणावर श्रीरामाचा विजय, तर सामाजिक महत्त्व म्हणजे एकत्र येणे, नातेसंबंध मजबूत करणे आणि समृद्धी साजरी करणे. त्यातही दिवाळीतील जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत कारण ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत, जसे की दिवे लावणे, रांगोळी काढणे आणि मिठाई वाटणे. यासोबतच, आधुनिक काळातही नवीन वस्तू खरेदी करणे आणि घरांना आकर्षक पद्धतीने सजवणे यांसारखे नवीन परंपरा स्वीकारल्या गेल्या आहेत.

भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा, नोट करून घ्या रेसिपी

दिवाळीचे धार्मिक महत्त्व

वाईटावर चांगल्याचा विजय: हिंदू पुराणांनुसार, रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परतले, या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तेथील लोकांनी दिवाळी साजरी केली. इथूनच दिवाळीची सुरुवात झाली.

इतर धर्मांमध्येही महत्त्व: जैन धर्मात भगवान महावीरांना मोक्ष मिळाल्याचा दिवस, तर शीख धर्मात गुरु हरगोविंद सिंह यांच्या सुटकेची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

अंधारावर प्रकाशाचा विजय: अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि निराशेवर आशेचा विजय साजरा करणे हे दिवाळीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.

दिवाळीचे सामाजिक महत्त्व

दिवाळी हा केवळ दिवे लावण्याचा किंवा फटाके फोडण्याचा सण नाही, तर समाजातील एकोपा, प्रेम आणि आनंद यांचं प्रतीक आहे. या सणाचं सामाजिक महत्त्व वेगवेगळ्या गोष्टीतून दिसून येतं.

फटाक्यांचा काळा धूर संपूर्ण शरीरात पसरलाय? हे 5 घरगुती उपाय फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण-श्लेष्मा काढतील बाहेर

एकोपा: दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या समाजातील सर्वजण एकत्र येतात. आप्तेष्ट, मित्र-नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी भेटीगाठी होतात. यामुळे सामाजिक बंध अधिक मजबूत होतात.

दान आणि मदतीची भावना: अनेक ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने गरजू, वृद्धाश्रम किंवा अनाथालयांना मदत केली जाते.

स्त्री-पुरुष समानता आणि गृहसंस्कृती: घराची स्वच्छता, सजावट आणि फडफडणारे दिवे हे सर्वजण मिळून करतात. त्यामुळे घरगुती कामांमध्ये सर्वांच्या सहभागाची भावना बळकट होते.

दिवाळीत पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा

दिवा लावणे: प्रत्येक घरात सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याची प्रथा आजही आहे, ज्यामुळे सकारात्मकता आणि मांगल्याची भावना येते.

रांगोळी काढणे: घरासमोर सुंदर रांगोळी काढून घराला सजवण्याची प्रथा आजही लोकप्रिय आहे.

मिठाई वाटणे: दिवाळीत खास पदार्थ आणि मिठाई बनवून इतरांना वाटण्याची जुनी पद्धत आजही सुरू आहे.

अभ्यंग स्नान: नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उटणे लावून तेलाने आंघोळ करण्याची परंपरा आहे. यामुळे शरीर शुद्ध होतं आणि आरोग्य टिकून राहतं.

फराळ बनवणे: चकल्या, करंज्या, लाडू, शेव अशा पारंपरिक पदार्थांचा फराळ घराघरात बनवला जातो. यामुळे कौटुंबिक एकोपा आणि आनंद वाढतो.

भाऊबीज साजरी करणे: दिवाळीचा शेवट भाऊबीजेने होतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीमधील प्रेमाचा हा सुंदर बंध प्रत्येक दिवाळीत जपला जातो.

Web Title: Religious and social significance of diwali which old traditions are still alive today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • Hindu Festival
  • lifestyle news
  • Maharashtra Festival

संबंधित बातम्या

Samvat 2082 मध्ये बाजारात कमाईची मोठी संधी! गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंत परताव्याची शक्यता
1

Samvat 2082 मध्ये बाजारात कमाईची मोठी संधी! गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंत परताव्याची शक्यता

Delhi Air Pollution : दिल्लीकरांचा श्वास कोंडला! दिवाळीच्या मुहूर्तावर मोडला प्रदुषणाचा मागील चार वर्षांचा रेकॉर्ड
2

Delhi Air Pollution : दिल्लीकरांचा श्वास कोंडला! दिवाळीच्या मुहूर्तावर मोडला प्रदुषणाचा मागील चार वर्षांचा रेकॉर्ड

रोज सकाळी उठल्यावर या लहान पदार्थाचे सेवन करा, भविष्यात कधीही होणार नाही किडनीचा त्रास; स्वतः डॉक्टर करतात शिफारस
3

रोज सकाळी उठल्यावर या लहान पदार्थाचे सेवन करा, भविष्यात कधीही होणार नाही किडनीचा त्रास; स्वतः डॉक्टर करतात शिफारस

Bhaubeej 2025: भाऊबीजेला बहीण भावाला नारळ का देते? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व
4

Bhaubeej 2025: भाऊबीजेला बहीण भावाला नारळ का देते? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.