
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी शरीरासाठी ठरेल फायदेशीर! पोटात थंडावा राहण्यासोबतच चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
मागील बऱ्याच वर्षांपासून गुलाब पाण्याचा वापर त्वचेसंबंधित समस्यांसाठी केला जात आहे. गुलाब पाण्यात असलेले नैसर्गिक गुधर्म त्वचा अधिक हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, पिंपल्स तर वाढत्या उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलाब पाणी त्वचा कायमच चमकदार ठरते. गुलाब पाणी शरीरासाठी अतिशय सौम्य आणि नैसर्गिक प्रभावी घटक मानला जातो. वाढत्या उष्णतेमुळे सतत येणारा घाम, त्वचेवर येणारे मोठे मोठे फोड कमी करण्यासाठी गुलाब पाणी खूप जास्त फायदेशीर ठरते. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि त्वचेला थंडावा देणारे घटक आढळून येतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर इतर कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी गुलाब पाण्याचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
गुलाब पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्वचेवर गुलाब पाणी योग्य पद्धतीमध्ये वापरल्यास सकारत्मक परिणाम दिसून येतील. गुलाब पाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता. यासाठी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी केल्यानंतर चेहरा कपड्याने पुसून घ्यावा. त्यानंतर गुलाब पाणी चेहऱ्यावर लावून घ्या. गुलाब पाणी त्वचेमध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर त्यावर इतर दुसरे प्रॉडक्ट लावावे. नियमित गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर जमा होणारी धूळ, माती आणि घाण कमी होईल आणि उन्हात सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल. नियमित वापर केल्यास महिनाभरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.
कोणताही फेसपॅक किंवा फेस मास्क तयार करताना त्यात गुलाब पाणी टाकावे. गुलाब पाणी टाकल्यामुळे फेसमास्क व्यवस्थित मिक्स होतो. बेसन, चंदन किंवा मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास त्वचा थंड राहते आणि चेहऱ्यावर वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त वेळ उन्हात गेल्यामुळे सतत जळजळ किंवा लाल रॅश येत असतील तर मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. संवेदनशील त्वचेसाठी गुलाब पाणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेला कोणताही त्रास होत नाही.
उष्णतेमुळे चेहऱ्यावर सतत जळजळ, लालसरपणा किंवा घामोळ्या येतात. अशावेळी गुलाब पाणी थेट त्वचेवर लावावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. तसेच डोळ्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाणी वापरण्याचा सल्ला कायमच दिला जातो. गुलाब केवळ त्वचेसाठीच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलकंद नियमित खाल्ल्यास पोटात वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी होण्यास मदत होईल.