
28 वर्षांची प्रतीक्षा संपली! भगवान बुद्धांची तपोभूमी सारनाथचा UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
उत्तर प्रदेशच्या पर्यटनाला मिळणार चालना
सारनाथ हे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे, ज्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाला आहे. जर उत्तर प्रदेशाविषयी बोलणं केलं तर हे राज्यातील चौथे स्थळ आहे. याआधीही उत्तर प्रदेशच्या तीन स्थळांना युनेस्को यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. यात प्रामुख्याने ताजमहल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर सिक्री यांचा समावेश होतो. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, या या जागतिक मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर प्रदेशातील ‘बुद्धिस्ट सर्किट’ आता आणखी मजबूत होईल.
२८ वर्षांची प्रतिक्षा
पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, सारनाथ एका रात्रीतच युनेस्कोच्या यादीत सामील झाले नाही तर या ठिकाणाला ३ जुलै १९९८ मध्ये युनेस्कोच्या ‘टेंटेटिव लिस्ट’ मध्ये सामील करण्यात आले. आता २८ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर सारनाथला प्रतिष्ठित दर्जा प्राप्त झाला आहे.
बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाची पवित्र भूमी
सारनाथचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी मानवतेच्या कल्याणासाठी सर्वात पहिला उपदेश सारनाथ या ठिकाणी दिला. बाैद्ध धर्मातील या महान घटनेला ‘धर्मचक्र प्रवर्तन’ या नावाने ओळखले जाते. ‘ऋषीपट्टण’ सारख्या अनेक प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख आढळून आला आहे, यावरुन आपल्याला ठिकाणाच्या पवित्रतेचा अंदाज येतो.
एएसआयने केली सुधारणा
जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होण्याच्या काही महिन्यांआधी भारतीय पुरतत्व सर्वेक्षणाने या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण बदल केले. एएसआयने इंग्रजांनी लावलेल्या फलकाला काढून इतिहासात दुरुस्ती केली. सुरुवातीला या ठिकाणाच्या शोधाचे श्रेय ब्रिटिशांना दिले जात होते, परंतु आता हे स्पष्ट करण्यात आले आहे की, सारनाथच्या शोधाचा खरा श्रेय हा स्थानिक राजघराण्यातील बाबू जगत सिंग यांना जाते. मार्च महिन्यात, बाबू जगत सिंहचे वंशज प्रदीप नारायण यांनी एक निवेदन केले होते ज्यात त्यांनी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ऐतिहासिक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या स्थळाचे उत्खनन सर्वप्रथम बाबू जगत सिंग यांच्या आदेशानुसार करण्यात आले होते स्पष्ट केले आहे.