Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात बुटांचा घाण वास येतो? यासाठी ‘हे’ उपाय करा…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 16, 2022 | 09:47 AM
पावसाळ्यात बुटांचा घाण वास येतो? यासाठी ‘हे’ उपाय करा…
Follow Us
Close
Follow Us:

 

कामानिमित्त किंवा दिवसभर ऑफिसमध्ये बूट घालून फिराव्या लागणाऱ्या व्यक्तींनी बूट काढले की तळपायाला वास येण्याचा अनुभव घेतला असेलच. तो टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अगदी परफ्यूमही वापरला जातो. पण तरीही ही दुर्गंधी जात नाही. त्यामुळे अर्थातच आपल्याला खूप लाज वाटते.पायांना येणाऱ्या या दुर्गंधीला ब्रोमिहाईड्रोसिस या नावानेही ओळखले जाते. मुळातच हा प्रश्‍न उद्भवतो तो पायाला येणारा घाम न सुकल्यामुळे. सर्वांच्याच शरीरावर जीवाणू असतातच पण काही व्यक्तींचा पायाचा घाम न सुकल्याने तो या जीवाणूंच्या संपर्कात येतो आणि पायाला घाण वास येऊ लागतो.  काही घरगुती उपायांनी पायांची येणारी दुर्गंधी कमी करता येऊ शकते.

जर शक्य असेल आणि ३ ते ४ दिवस बूट घातला नाही तरी चालणार असेल, तर हा उपाय करता येईल. ओलसर बुटांमधून जास्त दुर्गंध येतो. त्यामुळे ओलसर बूट एकदा साबण किंवा वॉशिं्शग पावडर लावून चांगले धुवून घ्या. आणि उन्हामध्ये २ ते ३ दिवस ते चांगले वाळू द्या.यामुळे बुटांमधली दुर्गंधी चटकन कमी होते. बाहेरून आल्या आल्या बुट कपाटात किंवा शू रॅकमध्ये बंद करून ठेवण्याची सवय अनेक जणांना असते. असे बंद कपाटात ठेवलेले बूट मग थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे कमीतकमी १० तासांनंतर बाहेर निघतात. त्यामुळे त्यांचा दुर्गंध आणखी वाढतो. कारण आपण बूट घालून बाहेरून जेव्हा येतो तेव्हा पायांना घाम आलेला असतो. घामामुळे बुटही ओलसर झालेले असतात. म्हणून बुटांचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत किमान २ तास तरी ते मोकळ्या हवेत ठेवा.

बुटांमध्ये तुम्ही तुमचं नेहमीचं टाल्कम पावडर थोडं टाकून ठेवा. यामुळे बुटांमधला ओलसरपणा आणि दुर्गंध दोन्हीही शोषून घेतल्या जाईल तसेच पावडरचा सुवास बुटांना लागेल. आजकाल मेडिकेटेड फूट पावडर देखील मिळतात. या पावडर बुटांमध्ये टाकून ठेवल्याने त्यांच्यात फंगसची होणारी वाढ रोखली जाते आणि त्यामुळे आपोआपच घाण वास येणं कमी होतं. जाडसर सॉक्स घालत असाल तर तळपायांना जास्त घाम येतो आणि दुर्गंधी वाढते. त्यामुळे sweat-wicking सॉक्स घालण्यास प्राधान्य द्या. यामुळे घाम कमी येतो. तसेच कॉपरचा बेस किंवा रबराचा बेस असणारे सॉक्सही बाजारात मिळतात. हे सॉक्स घातल्यानेही घाम कमी येतो. कॉटन किंवा होजियरीचे सॉक्स घालत असाल तर ते दर २ दिवसांनंतर धुतलेच पाहिजेत याची काळजी घ्या.

Web Title: Shoes smell dirty in rainy season do this solution for nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2022 | 09:47 AM

Topics:  

  • Monsoon Tips
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.