
स्त्री 'अस्पृश्य' असू शकत नाही! सबरीमाला प्रकरणी न्यायमूर्तीचे मासिक पाळीबद्दल स्पष्ट मत, महिलांच्या अधिकारांवर केली जोरदार चर्चा
मेहता म्हणाले की, त्या निर्णयाने मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्याची तुलना अस्पृश्यतेशी केली आहे. भारतातील पितृसत्ताक समाजाची व्याख्या पाश्चात्य देशांमधून आली आहे आणि ती भारतात लागू होत नाही. त्यामुळे, गोष्टींकडे पाश्चात्य दृष्टिकोनातून पाहणे हीदेखील एक समस्या आहे. खंडपीठातील एकमेव महिला न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही. बी. नागरत्ना यांनी तुषार मेहता यांच्या टिप्पणीला उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, एक स्त्री म्हणून तिला दर महिन्याला तिच्या मासिक पाळीच्या काळात तीन दिवस अस्पृश्य बनवता येणार नाही. मग, चौथ्या दिवशी ते संपते.
है एक कठोर वास्तव आहे. एक स्त्री म्हणून कलम १७ तीन दिवस लागू होत नाही आणि मग चौथ्या दिवशी असे म्हटले जाते की अस्पृश्यता नावाच्ची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. त्यानंतर, जेव्हा सबरीमालाचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा सॉलिसिटर जनरल म्हणाले की, सबरीमाला मंदिराचा मुद्दा हा लिंगभेदाचा नाही. हा मान्यतेचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
पितृसत्ताक ही व्याख्याच चुकीची
मेहता असेही म्हणाले की, मंदिर प्रवेशातील भेदभावासंदर्भातील पूर्वीच्या निर्णयांमध्ये, जातीच्या आधारावर एखाद्याला प्रवेश नाकारणे चुकीचे मानले जात होते. या विषयावर लिंगाच्या आधारावर कधीही चर्चा झाली नाही. दुर्दैवाने, इतिहासात एके काळी हिंदू समाजाच्या एका वर्गाला पूजेच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते. पण त्यात कोणताही लिंगभेद नव्हता. तथापि, गेल्या काही दशकांत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे प्रत्येक मुद्यांकडे लिंगाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. संविधानाचे कलम १४ समानतेबद्दल बोलते आणि त्यात लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही. कलम १५ सांगते की, लिंग ओळखीची पर्वा न करता प्रत्येकाला समान मूलभूत हक्क आहेत.
भारतात महिलांची पूजा
मेहता माणाले की, भारतात महिलांना केवळ समान दर्जाच नाही, तर उच्च दर्जाही आहे. असे अनेक न्यायालयीन निर्णय आहेत जे पितृसत्ताक समाजावर चर्चा करतात आणि लिंगभेदाच्या रूढी दर्शवतात. तथापि, भारताचे प्रकरण चेगळे आहे. भारतीय समाजात आपण महिलांची पूजा करतो. भारताचे राष्ट्रपती असोत, पंतप्रधान असोत किया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरोत, सर्वजण देवीपुढे नतमस्तक होऊन त्यांची पूजा करतात, त्यामुळे, भारतातील पितृसतेची व्याख्या पाश्चात्य देशांप्रमाणे लागू होत नाही, भारतात अशा भावना कधीच अस्तित्वात नव्हत्या.
Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट
५० हून अधिक पुनर्विचार याचिका
धार्मिक स्थळावर महिलांसोबत होणाऱ्या भेदभावासंबंधीचे हे प्रश्न गेल्या २६ वर्षांपासून देशभरातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालय मंगळवारपासून २२ एप्रिलपर्यंत ५० हून अधिक याचिकांवर अंतिम युक्तिवाद ऐकणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते आणि त्याचे समर्थक ७ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात आपला युक्तिवाद सादर करू शकतील, तर याचिकेला विरोध करणारे १४ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत आपला युक्तिवाद सादर करतील.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.