
कडक उन्हाळ्यात वाटेल फ्रेश! ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सांगितलेले 'हे' उपाय नक्की करा
उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाय?
ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या सोप्या टिप्स?
वाढत्या उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडक ऊन पडत आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.कडक उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे डोकेदुखी, चक्कर तर काहीवेळा हार्ट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उन्हाचा फटका बसल्यास आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. हीटस्ट्रोक, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि पोटासंबंधी आजारांच्या समस्या निर्माण झाल्यानंतर शरीर कमकुवत होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हे उपाय केल्यास उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळेल आणि पचनक्रिया कायमच सुरळीत चालू राहील. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित किंवा आठवड्यातून दोनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्याच्या सेवनामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. ऋजुता यांनी सांगितल्यानुसार, नारळ पाणी कधीही दुपारी १२ वाजण्याच्या आधी प्यावे. नारळ पाण्यासोबतच एक चमचा चिया सीड्स पाण्यात मिक्स करून प्यावेत. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशिअम आणि मॅगनीज असल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि हे एक नॅचरल कुलंट आहे, ज्यामुळे तुमचे शरीर कायमच हायड्रेट राहील. नारळ पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते.
दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करावा. दही, ताक प्यायल्यामुळे पोटात थंडावा कायम टिकून राहतो आणि उष्णता कमी होण्यास मदत होते. दही किंवा ताक पिताना भाजलेल्या जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दही आणि ताकाचे सेवन करावे.
पोटाच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी नियमित एक केळ खावे. ऋजुता यांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक केळ खावे. केळी पोटासाठी फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. केळी खाल्ल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि पोट हलके होते. आतड्यांमध्ये जमा झालेली चिकट मल बाहेर काढून टाकण्यासाठी केळी खावी.
उन्हात पोटात वाढलेल्या जळजळमुळे आंबट ढेकर येतात? तात्काळ आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या फेजमध्ये शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे पचनक्रिया स्लो होऊन पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे महिलांनी आहारात सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास पौष्टिक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
Ans: दिवसभरात भरपूर पाणी, ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, आणि फळांचा रस प्या. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी पित राहा.
Ans: काकडी, टरबूज, खरबूज, संत्री यांसारखी रसाळ फळे खा. दही आणि ताकाचा आहारात समावेश करा. तेलकट, मसालेदार आणि शिळे अन्न टाळा, कारण यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.
Ans: कडक उन्हातून आल्यावर लगेच एसीमध्ये जाऊ नका किंवा थंड पाणी पिऊ नका, थोडा वेळ थांबा. डोळ्यांची आणि त्वचेची जळजळ टाळण्यासाठी गुलाब पाणी वापरा.