
आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे
Teachers Day: शिक्षक हे समाज घडविणारे कलावंत असतात. ज्याप्रमाणे मूर्तिकार मूर्तीला आकार देतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना आकार देण्याचे मौलिक काम करतात. सुसंस्कारित करून ज्ञान, कला, कौशल्य, संस्कार शिकवतात. ही माझी शाळा आहे, मी एक शिक्षक आहे, विद्यार्थी माझे दैवत आहेत व विद्यार्थ्यांना घडविणे हाच माझा स्वधर्म आहे. असे मानून शिक्षक रात्रंदिवस विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करतात. विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षकांना सुद्धा काही अडचणींना सामोरे जावे लागते. काही समस्या काही प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. आधुनिक परिवर्तनशील शैक्षणिक प्रवाहातील काही आव्हाने त्यांच्यासमोर उभे राहतात. त्यांना सोडवण्याचा ते कसोशीने प्रयत्न करत असतात. आज शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याबद्दल त्यांच्या कर्तव्याबद्दल थोडक्यात आढावा घेण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)
५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ! एक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, राजकीय विचारवंत, आर्थिक तत्त्ववेत्ता, समाज सुधारक व देशाला लाभलेले पूर्व राष्ट्रपती म्हणून ज्यांचा गौरव केला जातो. त्यांचा जन्मदिवस देशाला भक्कम मजबूत व नवयुवक, तरुण पिढीचा भक्कम पाया निर्माण करावयाच्या असेल तर तो शिक्षकच करू शकतो. मुलांचे पहिले गुरू आई-वडील असतात तर आई वडिलानंतर शिक्षकच मुलाचे भविष्य घडवत असतात. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत, घडवत ते राष्ट्राचे भविष्य घडवत असतात. राष्ट्राची उभारणी करीत असतात. शिक्षक सर्वप्रथम आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून, विद्यार्थ्यांवर छाप पाडत असतात. विद्यार्थ्यांना आपलंसं करून घेतात. आठवा लहानपणीचे ते दिवस.
आजही आपल्याला आपल्या लहानपणीचे शिक्षक आठवतात. आपल्यासमोर वर्गात बसलेली ही चिमुकली मुले निरागस चेहऱ्याची, भोळी भाबडी, आपल्यावर जीवापाड प्रेम कर्णारी, जिवापाड विश्वास ठेवणारी, असतात. त्यांच्या विचारानुसार शिक्षक हेच गुरु असतात. मार्गदर्शक असतात. पालक असतात. चांगल्या गोष्टी शिकवणारे असतात. म्हणून शिक्षकाला नेहमी अलर्ट, दक्ष, कर्तव्यदक्ष, राहिले पाहिजे. कारण शिक्षक हे मुलांच्या जीवनाचा पाया घडवत असतात. पाया हा भक्कम व योग्य दिशादर्शक असला पाहिजे. तरच ही मुले शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गावर पुढे चालत राहतात. पण आज काळ बदलला, काळाचे परिवर्तन झाले.
दप्तरांचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न झाला. ही एक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली व हितकारक बाब आहे. तेव्हा अशा तंत्रज्ञानात झालेल्या बदलाला स्वीकारणे हे आधुनिक शिक्षकांचे कर्तव्य आहे. शिक्षकांनी काळाप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे. तरच शिक्षक आजच्या या नवीन पिढीसमोर उभारू शकतात.