
महिनाभरात कमी होईल पोट मांड्यावर वाढलेले वजन! सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करा 'हा' चिमूटभर पदार्थ
वजन कमी करण्यासाठी उपाय?
जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे?
चरबीचा घेर कशामुळे वाढतो?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी गोष्टीच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाण्याची शक्यता असते. जगभरात वाढलेल्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. लठ्ठपणा आणि पोट मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारातील महागडे डाएट तर कधी वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या सप्लिमेंट्स आणि गोळ्या औषधांमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेली अनावश्यक चरबी तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे वाढते. यामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब यांसारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणतेही फॅन्सी उपाय करण्याऐवजी दैनंदिन आहारात बदल आणि घरगुती उपाय करावेत. यामुळे पोट आणि मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – istock)
पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी जिऱ्याचे सेवन करावे. जेवणाला फोडणी देताना त्यात जिरं टाकलं जाते. यामुळे खाल्लेला पदार्थ सहज पचन होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये असलेले आयुर्वेदिक औषधी गुणधर्म शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. कमीत कमी वेळात वजन कमी करायचे असल्यास जिऱ्याचे सेवन करावे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले जिरं संपूर्ण शरीरासाठी प्रभावी ठरते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खास तुम्ही जिऱ्याचे पाणी बनवून पिऊ शकता.
जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी, एक ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा जिरं भिजत ठेवावे. रात्रभर जिरं पाण्यात भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाणी टोपात ओतून जिरं व्यवस्थित उकळवून अर्धा पाणी करावे. जिऱ्याच्या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून जिऱ्याचे पाणी गाळून कोमट करण्यासाठी ठेवा. कोमट पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. याशिवाय जिऱ्याच्या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबाचा रस किंवा मध सुद्धा मिक्स करू शकता.
जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही केमिकल युक्त पेयांचे सेवन करण्याऐवजी जिऱ्याचे पाणी प्यावे. जिऱ्याच्या पाण्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि आतडे स्वच्छ होतात. पोटाची चरबी कमी करण्यापासून ते ऍसिडिटीच्या समस्येवर जिऱ्याचे पाणी प्यायल्यास लगेच आराम मिळेल. जिऱ्याचे पाणी शक्यतो रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे लवकर फरक दिसून येईल.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्यायले जाते. जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे वजन नियंत्रणात राहते, खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. पण जिऱ्याचे पाणी मर्यादित प्रमाणात प्यावे. अतिप्रमाणात जिऱ्याचे पाणी प्यायल्यास आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. तसेच वजन कमी करताना नियमित व्यायाम आणि योगासने सुद्धा करावीत. व्यायाम केल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात.
Ans: गोड पेये, साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ (processed food) आणि फॅटी पदार्थ टाळा.
Ans: जेवणात मसूर, अंडी, मासे किंवा दही यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
Ans: निरोगी राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. .