Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काविळमुळे अशक्तपणा जाणवतो? आरोग्यासंबंधित कोणते आजार उद्भवल्यानंतर कोणत्या रसाचे करावे सेवन, जाणून घ्या सविस्तर माहिती

दैनंदिन जीवन जगताना आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फळांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणता आजार झाल्यानंतर कोणता रस प्यावा, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2025 | 05:30 AM
आरोग्यासंबंधित कोणते आजार उद्भवल्यानंतर कोणत्या रसाचे करावे सेवन

आरोग्यासंबंधित कोणते आजार उद्भवल्यानंतर कोणत्या रसाचे करावे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला तणाव आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत राहतो. आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीराला आजाराची लागण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित काही सामान्य समस्या उद्भवू लागतात. मात्र समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट असणे आवश्यक आहे. मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतरर किंवा साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात बदल होऊ लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

लघवी करताना आग होते? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तात्काळ मिळेल आराम, मुतखडा पडेल लघवीतून बाहेर

अशक्तपणा, थकवा किंवा उलट्या, मळमळ होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. यामुळे शरीरात झालेल्या आजाराचे निदान करणे सोपे जाते. अनेकदा आजारी असल्यानंतर फळांचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टरांसह इतर सगळेच देतात. पण कोणत्या फळांचा रस कोणत्या आजारावर प्रभावी ठरतो, हे आपल्यातील अनेकांना माहित नसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या आजाराची लागण झाल्यानंतर कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊया.

भूक कमी लागणे:

भूक कमी झाल्यानंतर शरीराचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. कमी झालेल्या भुकेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पोटभर अन्नपदार्थांचे सेवन करावे. भूक कमी झाल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. कोणताही पदार्थ बनवल्यानंतर भूक नाही म्हणून खाणे टाळले जाते. मात्र या समस्येपासून सुटका मिळ्वण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. लिंबाचा रस सैंधव मीठ टाकून उपाशी पोटी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. भूक वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू, गाजर, बीट, पालक, तुळशी, कडूलिंब, बेलाची पानं आणि कोबीच्या रसाचे सेवन करू शकता. या रसाच्या सेवनामुळे निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर होईल.

कावीळ:

कावीळ झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. याशिवाय डोळे, नखं पिवळे पडून जातात. कावीळ झाल्यानंतर द्राक्ष, सफरचंद आणि मोसंबीचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. या रसाच्या सेवनामुळे शरीरातील कावीळ बरी होण्यास मदत होते. या रसांशिवाय तुम्ही गाजर, पालक, तुळशी, द्राक्ष आणि मोसंबी इत्यादी भाज्या आणि फळांच्या रसाचे सेवन करावे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल कच्ची पपई, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

त्वचेसंबंधित समस्या:

त्वचेच्या सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून त्वचेचे सौंदर्य वाढवावे. दैनंदिन आहारात गाजर, कलिंगड, कांदा, तुळशीच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचेचे सौंदर्य वाढते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा ताज़ीटवटवीत दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Which juice should be consumed after the onset of any health related illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • healthy fruits

संबंधित बातम्या

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
1

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात
2

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण
3

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता
4

हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन,शरीरात कधीच भासणार नाही रक्ताची कमतरता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.