
पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसात भिजून आल्यानंतर सर्दी, खोकला, ताक तर काहीवेळा साथीच्या आजारांची सुद्धा लागण होते. पाऊस सुरु झाल्यानंतर सर्दी खोकल्यासोबत सांधेदुखी, गुडघेदुखी आणि जुन्या जखमांचे दुखणे वाढू लागते. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. थंड वातावरणामुळे हात-पाय आणि सांधे जखडून जातात. सांधेदुखी, फायब्रोमायल्जिया, नर्व्ह पेन इत्यादी अनेक गोष्टींचा त्रास वाढू लागतो. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना काहीवेळा खूप असह्य होतात आणि आरोग्य बिघडून टाकतात. खाली बसताना किंवा वर उठताना पायांमध्ये वेदना जाणवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
पावसाळ्यात शरीरसंबंधित कोणत्या ना कोणत्या समस्या कायमच उद्भवतात. वातावरणात होणारे बदल आणि मानसिक तणाव वाढल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. हातापायांमध्ये किंवा गुडघ्यात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरच्या गोळ्या घेतल्या जातात. पण या गोळ्या खाल्ल्यामुळे तात्पुरता आराम मिळतो पण किडनीच्या आजारांची लागण होते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात सांध्यांमध्ये वेदना का होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वारंवार सांधे दुखत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.
डॉक्टरांच्या मते, पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर गुडघ्यांमध्ये वेदना वाढू लागतात. कारण पाऊस येण्याआधी आणि पाऊस आल्यानंतर बॅरोमेट्रिक प्रेशर वेगाने कमी जास्त होतो. याचा थेट परिणाम शरीरावर होतो. सांध्यांमध्ये वेदना आणि स्नायूंवर जास्तीचा तणाव येतो. हवेचा दाब कमी झाल्यामुळे शरीरातील ऊती किंचित प्रसरण पावतात, ज्याचा परिणाम सांध्यांवर होतो. तसेच जुन्या जखमा किंवा हाडांच्या वेदना वाढू लागतात. पावसाळ्यात रक्तभिसरण मंदावते. रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर सांध्याच्या आसपासचे स्नायू, टेंडन्स आणि ऊतींमध्ये कडकपणा येतो. यामुळे सांधे जड होतात आणि हालचाल करताना वेदना वाढू लागतात.
जुनी दुखापत , शस्त्रक्रिया किंवा सांधेदुखीमुळे शरीराचा एक भाग कमजोर होऊन जातो. तसेच बदलत्या वातावरणाचा परिणाम मज्जासंस्थेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी थंड हवेपासून स्वतःचा बचाव करणे फार आवश्यक आहे. याशिवाय वेदना खूप जास्त वाढू लागल्यास गरम पाण्याचा किंवा मिठाचा शेक घ्यावा. यामुळे सांध्यांना आलेली सूज कमी होते आणि आराम मिळतो. तसेच नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास शारीरिक आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा सुधारेल.
Ans: पावसाळ्यात आर्द्रता (Humidity), वातावरणातील दाबातील बदल, कमी सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन D ची कमतरता यामुळे सांधे आणि हाडांच्या वेदना वाढू शकतात.
Ans: नियमित हलका व्यायाम, स्ट्रेचिंग, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D युक्त आहार, पुरेसा सूर्यप्रकाश आणि शरीर उबदार ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: दूध, दही, पनीर, तीळ, बदाम, हिरव्या पालेभाज्या, अंडी, मासे आणि कॅल्शियम व व्हिटॅमिन D युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.