Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Farmer: राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा! ३७ टक्के सुधारीत पैसेवारी झाली जाहीर

खरीप पिकांची स्थिती आणखीनच बिकट झाल्याने तहसील प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली, तीही पूर्वीइतकीच ३७पैसे निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2025 | 03:21 PM
37 percent improved payment to farmers for Kharif crops announced Maharashtra Farmer News

37 percent improved payment to farmers for Kharif crops announced Maharashtra Farmer News

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Farmer: किनवट: यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले असून कपाशीची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रारंभी काढलेली नजर अंदाज पैसेवारी ३७ पैसे इतकी होती. पुढे खरीप पिकांची स्थिती आणखीनच बिकट झाल्याने तहसील प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली, तीही पूर्वीइतकीच ३७पैसे निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील एकूण १९१ गावांमध्ये पैसेवारी लागू असून लागवडीयोग्य क्षेत्र ८१ हजार ७४.७८ हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात ७९हजार १४१ हेक्टरवर पेरणी झाली, तर २ हजार २२८.७८ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात एकूण १२ अतिवृष्टीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. महसूल मंडळनिहाय पाहता जलधारा मंडळात ९, शिवणीमध्ये ७, सिंदगी मोहपूरमध्ये ५, इस्लापूर, मांडवी, दहेली आणि उमरीबाजार मंडळात प्रत्येकी ४ तर किनवट व बोधडी मंडळात प्रत्येकी ३ अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. अशा प्रकारे एकूण ४३ वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जिरायती पिकांचे तब्बल ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पूरस्थितीमुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे ५६ हजार ६३४ हेक्टरवरील जिरायती पिकांचे तब्बल ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका १७६ गावांतील ५१ हजार ४८८ शेतकऱ्यांना बसल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. साधारणपणे पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत असेल तर पीकस्थिती गंभीर मानली जाते, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पैसेवारी उत्तम स्थिती दर्शवते. त्यानुसार शासन ओला किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत देते.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार डॉ. शारदा बोंडेकर यांनी ३० सप्टेंबर रोजी खरीप हंगाम २०२५ ची हंगामी पैसेवारी जाहीर केली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ महसूल मंडळांतील निवडक सज्जांमध्ये हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीत प्रत्येकी तीन पीक कापणी प्रयोग घेऊन गाव पैसेवारी समितीच्या सहकार्याने सुधारीत पैसेवारी निश्चित करण्यात आली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या किनवट तालुक्यातील नऊही महसूल मंडळांतील ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी अपेक्षेप्रमाणे नजरअंदाज इतकीच म्हणजेच ३७ पैसे (५० पैशांपेक्षा कमी) निघाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल प्रशासनाकडून अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासनाने सवलती केल्या लागू

शासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुके आपत्तीग्रस्त घोषित केले असून, बाधितांना दुष्काळसदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सर्व सवलती देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती, तिमाही वीज देयकात माफी, परीक्षा शुल्कात माफी आणि दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फी माफीची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 37 percent improved payment to farmers for kharif crops announced maharashtra farmer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • daily news
  • maharashtra farmers
  • nanded news

संबंधित बातम्या

Satara News: महावितरण विरोधात वाईत शेतकरी आक्रमक: सौर ऊर्जा धोरणाने नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पेच
1

Satara News: महावितरण विरोधात वाईत शेतकरी आक्रमक: सौर ऊर्जा धोरणाने नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पेच

वंदे मातरम् – स्वातंत्र्य लढ्यातील एक हुंकार, जाणून घ्या कसे बनले राष्ट्रीय गीत
2

वंदे मातरम् – स्वातंत्र्य लढ्यातील एक हुंकार, जाणून घ्या कसे बनले राष्ट्रीय गीत

Kolhapur welcome arch demolished : कोल्हापूरकर झाले भावूक! तावडे हॉटेल चौकातील दोन दशकांची स्वागत कमान जमीनदोस्त
3

Kolhapur welcome arch demolished : कोल्हापूरकर झाले भावूक! तावडे हॉटेल चौकातील दोन दशकांची स्वागत कमान जमीनदोस्त

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार
4

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.