Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन

जिल्ह्यात 34 हजार गणेशमूर्ती आणि 15 हजार गौरी मूर्तीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 02, 2025 | 05:20 PM
Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव काकडे : राज्यात गणेशोत्सव मोठ्या धामधूममध्ये साजरा केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात आज गौरी गणपतींना निरोप देण्यात येत आहे. जिल्ह्यात 34 हजार गणेशमूर्ती आणि 15 हजार गौरी मूर्तीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. यात 173 सार्वजनिक गणेश मूर्ती तर 34 हजार 294 घरगुती गणेशमूर्तीचा समावेश असणार आहे. या वर्षी गौरी आगमनाची तारीख उशिरा आल्यामुळे सात दिवसांच्या गणेशोत्सवासोबतच गौरींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील विसर्जन सोहळा अधिक उत्साहात पार पडणार आहे.

साधारणपणे गौरींचे आगमन गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी होते आणि दोन दिवसांच्या पूजनानंतर त्या निरोप घेतात. मात्र, यंदा पंचांगानुसार गौरी आगमनाची तारीख उशिरा आली. यावर्षी गौरींचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा सात दिवसांच्या गणपतीसोबतच गौरीपूजनाचे दिवस आले आहेत. म्हणून सात दिवसांचे गणपती आणि गौरींचे विसर्जन एकाच दिवशी पार पडणार आहे.

Manoj Jarange Patil Live: आरक्षणाचा प्रश्न सुटणार? उपसमितीच्या मसुद्यावर जरांगे पाटलांचे मोठे विधान; म्हणाले…

पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून ढोल-ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत. तसेच ढोलताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत, पारंपारिक वेशभूषेत भाविक मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा 23 कृत्रिम तलाव, 77टाकी विसर्जन व्यवस्था, 15 फिरती विसर्जन केंद्र, 9 खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि 90 मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण 134 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देणार आहेत.

Manoj Jarange Patil Live: “… रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार”; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा 

ठाणे जिल्ह्यात भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने दीड लाखाहून अधिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झालेली. यामध्ये 1 लाख 56 हजार 782 घरगुती आणि 1 हजार 60सार्वजनिक गणेशमूर्तीचा सामावेश होता. सर्वाधिक सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ठाणे शहरात झाली तर सर्वाधिक घरगुती गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर ते बदलापूर या भागात झाली होती .यंदा 1 लाख 56 हजार 782  घरगुती आणि 1 हजार 60  सार्वजनिक असे एकूण 1 लाख 57  हजार 842 गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती.

Web Title: 49 thousand gauri ganpati idols immersed in thane today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त
1

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
2

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत
3

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला
4

नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.