Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटानं 18 जागांवर दावा सांगितल्यानंतर आता काँग्रेसचा पुण्यासह 21 जागांवर दावा?, काँग्रेसच्या सर्व्हेवरुन मविआत नवं राजकारण रंगणार?

2024 साली लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections) सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, या तिन्ही पक्षांचं जागावाटप कसं होणार असा प्रश्न चर्चिला जातोय.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2023 | 12:27 PM
ठाकरे गटानं 18 जागांवर दावा सांगितल्यानंतर आता काँग्रेसचा पुण्यासह 21 जागांवर दावा?, काँग्रेसच्या सर्व्हेवरुन मविआत नवं राजकारण रंगणार?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : 2024 साली लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Elections) सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, या तिन्ही पक्षांचं जागावाटप कसं होणार असा प्रश्न चर्चिला जातोय. 2019 च्या निवडणुकीत 48 पैकी 18 जागा शिवसेनेनं (Shivsena) मिळवल्या होत्या. त्या जागांवर शिंदे यांच्या बंडानंतरही ठाकरे गटानं दावा केलेला आहे. त्यातच काँग्रेसनं राज्यात केलेल्या सर्व्हेत काँग्रेसलाही राज्यात 21 मतदारसंघात पूरक स्थिती असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. अशी स्थितीत तिन्ही पक्षात जागावाटप होणार कसं असा प्रश्न निर्माण झालाय.

काय आहे काँग्रेसच्या सर्व्हेत?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं एक अहवाल पक्षश्रेष्ठींना दिल्याचं सांगण्यात येतंय. त्यात राज्यातील 48 पैकी 21 लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा यात करण्यात आलाय. तर विधानसभेसाठी राज्यात 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद चांगली असल्याचं सांगण्यात आलंय. या 21 जागी जर काँग्रेसनं आगामी काळात दावा केला, तर मविआतील जागावाटपात बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पुणे, कोल्हापूर, मुंबईतल्या दोन मतदारसंघांवरुन काँग्रेसचे आगामी काळात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी वाद होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.

काँग्रेसचे 21 लोकसभा मतदारसंघ

1. नागपूर
2. चंद्रपूर
3. गडचिरोली
4. रामटेक
5. अकोला
6. वर्धा
7. अमरावती
8. यवतमाळ
9. धुळे
10. नंदूरबार
11. शिर्डी
12. नांदेड
13. हिंगोली
14. लातूर
15. पुणे
16. सोलापूर
17. कोल्हापूर
18. हातकणंगले
19. सांगली
20. दक्षिण मध्य मुंबई
21. उत्तर पश्चिम मुंबई

या मतदारसंघांत काँग्रेसची स्थिती चांगली असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

कर्नाटक विजयानंतर काँग्रेस आक्रमक

कर्नाटक विधानसभेतील विजयानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतंय. अशा स्थितीत महाराष्ट्रात लोकसभा जागेसाठी काँग्रेस पूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसची मागणी 21 पर्यंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत जागावाटपाचा तिढा सुटणार तरी कसा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय.

Web Title: After the thackeray group claimed 18 seats now congress is claiming 21 seats including pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2023 | 12:27 PM

Topics:  

  • Congress
  • Loksabha Elections
  • maharashtra
  • Mumbai
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.