Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यवतमाळमध्ये तीन दिवसानंतर पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ३ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री आणि आज सकाळी पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2024 | 01:03 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ३ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री आणि आज सकाळी यवतमाळमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मुसळधार पाऊस बरसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल मध्यरात्री आणि आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

उत्तर कोकणात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी काल हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. पालघर जिल्ह्यात काल १३० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर रायगडमधील कर्जत येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज ठाणे, मुंबई, कोकण आणि कोल्हापुरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने आज अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे. नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भागांना हवामान विभागातर्फे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ३५ अंश सेल्सिअस कमाल तर २७ अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल, असे अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

 

Web Title: After three days of rain in yavatmal the farmer was happy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर
1

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन
3

“समाजाच्या सर्व घटकांपर्यंत सेवा, संवेदना आणि विकास पोहोचविण्याचा भाजपाचा प्रामाणिक संकल्प”,नरेंद्र पवारांचे आवाहन

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश
4

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.