Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळे ग्रामसभा ग्रामस्थांनी उधळली; माजी जिल्हा परिषद सदस्याची जीभ घसरली

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेळे, तालुका वाई येथे बुधवारी सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. ग्रामस्थांनी ही ग्रामसभा उधळून लावली भैरवनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत ग्रामस्थ बाहेर पडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2022 | 03:10 PM
वेळे ग्रामसभा ग्रामस्थांनी उधळली; माजी जिल्हा परिषद सदस्याची जीभ घसरली
Follow Us
Close
Follow Us:

वाई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वेळे, तालुका वाई येथे बुधवारी सकाळी दहा वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच रफिक इनामदार यांनी भूषवले.

या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून गावठाण विस्तार या ग्रामसभेत विशेष गाजला. १९८१ साली तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा यांनी वेळे येथील गट क्रमांक ५०३/१ मधील सरकारी लष्करी तळ म्हणून असलेल्या जमिनीतील ३ एकर क्षेत्र हे राखीव गावठाण म्हणून घोषित केले आहे. तसे आदेश तहसीलदार वाई यांना देण्यात आले होते.

लोकसंख्या वाढीमुळे येथील नागरिकांना राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. स्वतः चे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसलेने नागरिक हैराण झाले होते. गेल्या चाळीस वर्षांपासून राखीव गावठाण म्हणून घोषित करण्यात आलेल्या क्षेत्रात प्रत्यक्षात गावठाण वाढ झाली नव्हती. यामुळेच येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला जागा मिळणेसाठी अर्ज केले व तसा ठराव पास व्हावा, यासाठी ग्रामस्थ आग्रही राहिले. मात्र सदरील गट नंबरमध्ये चार ते पाच जणांचा कब्जा असल्याने त्यांनी ग्रामसभेत ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीला काही कागदपत्रे सादर केली, मात्र सद्यस्थिती काय आहे याबाबत समाधानकारक माहिती ते देवू शकले नाहीत. ही एक प्रकारे ग्रामस्थांची दिशाभूल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यातूनच ग्रामस्थ व कब्जेधारक यांचेमध्ये वाद निर्माण झाला व तो विकोपाला गेला. त्यामुळेच नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. परिणामी ग्रामस्थांनी ही ग्रामसभा उधळून लावली भैरवनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत ग्रामस्थ बाहेर पडले.

[read_also content=”पेपरच्या वाढत्या किंमतीमुळे झेरॉक्स व्यावसायिक त्रस्त https://www.navarashtra.com/maharashtra/xerox-business-suffers-due-to-rising-cost-of-paper-nrdm-314822.html”]

माजी जिल्हा परिषद सदस्याची जीभ घसरली

माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांना ग्रामसभेत राग अनावर झाल्यामुळे त्यांनी शिवीगाळ केली. त्याचे पडसाद देखील या ग्रामसभेत उमटले. ग्रामसभेत अशी शिवराळ भाषा वापरणे हा ग्रामसभेचा अवमान आहे, मात्र आपल्या पदाचा व कर्तव्याचा विसर पडल्याने त्यांचे तोंडून असे शब्द बाहेर पडत आहेत, त्यास आम्ही घाबरत नाही, असे ग्रामस्थांनी नमूद केले.

Web Title: At the time gram sabha was disrupted by the villagers the tongue of the former zilla parishad member slipped nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 03:10 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
1

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.